शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

पांढरे सोने झाले काळे; अमरावती जिल्ह्यात दोन वेच्यातच कापसाची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:37 IST

पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामीचपऱ्हाटी उपटण्याची आली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. कुठे कमी पावसामुळे पीकच वर आले नाही. या पिकाची आता अखेर झाली आहे. एरवी हिवाळ्यात थंडी पडताच कपाशीला नवी बोंडे फुटतात. आणखी किती वेचे, कापूस घरी येईल, याचा अंदाज बांधला जातो. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्विग्नता आहे. सलग दुसऱ्या वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन घटले आहे. तिवसा तालुक्यात कोरडवाहू शेतात पहिल्या वेच्यात, तर सिंचनाच्या शेतात तीन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी झाली. झाडांची वाढ खुंटल्याने बोंडांची संख्या घटली. त्यातच कपाशी पीक पूर्णपणे सुकून गेल्याने त्या बोंडांमधून किडुकमिडुक कापूस शेतकऱ्यांच्या हाती आला. भयाण परिस्थिती असताना शासकीय खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असतानाही दुष्काळ जाहीर करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.तिवसा तालुक्यात ११,७२५ हेक्टर शेतात कपाशीची पेरणी करण्यात आली होती. आता कापूस, सोयाबीन व तूर ही तीनच मुख्य पिके शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत. तालुक्यात सिंचनासाठी अप्पर वर्धा धरणाचा कालवा गेला आहे. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणातून एकदाच पाणी सोडण्यात आले. कपाशीची पेरणी झाल्यानंतरही पाऊस कमी प्रमाणात आला. त्यामुळे झाडांना वाढीसाठी वाव मिळाला नाही. त्यातच यावर्षीसुद्धा बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी कापसावर कीटकनाशकांची फवारणी केली. परिणामी कीटकनाशकांच्या मात्रा अधिक झाल्याने झाडांची वाढ खुंटली. झाडांचा पसारा न वाढल्याने बोंडांची संख्या कमी झाली आहे. परिणामी यावर्षी बोंडअळीचा प्रकोप नसूनही कापसाचे उत्पादन घटले आहे. उलट शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशकांवर खर्च केल्याने मशागतखर्चात वाढ झाली आहे. कापसाला प्रतिक्विंटल किमान आठ हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस