शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पांढरे सोने झाले काळे; अमरावती जिल्ह्यात दोन वेच्यातच कापसाची उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:37 IST

पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामीचपऱ्हाटी उपटण्याची आली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. कुठे कमी पावसामुळे पीकच वर आले नाही. या पिकाची आता अखेर झाली आहे. एरवी हिवाळ्यात थंडी पडताच कपाशीला नवी बोंडे फुटतात. आणखी किती वेचे, कापूस घरी येईल, याचा अंदाज बांधला जातो. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्विग्नता आहे. सलग दुसऱ्या वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन घटले आहे. तिवसा तालुक्यात कोरडवाहू शेतात पहिल्या वेच्यात, तर सिंचनाच्या शेतात तीन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी झाली. झाडांची वाढ खुंटल्याने बोंडांची संख्या घटली. त्यातच कपाशी पीक पूर्णपणे सुकून गेल्याने त्या बोंडांमधून किडुकमिडुक कापूस शेतकऱ्यांच्या हाती आला. भयाण परिस्थिती असताना शासकीय खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असतानाही दुष्काळ जाहीर करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.तिवसा तालुक्यात ११,७२५ हेक्टर शेतात कपाशीची पेरणी करण्यात आली होती. आता कापूस, सोयाबीन व तूर ही तीनच मुख्य पिके शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत. तालुक्यात सिंचनासाठी अप्पर वर्धा धरणाचा कालवा गेला आहे. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणातून एकदाच पाणी सोडण्यात आले. कपाशीची पेरणी झाल्यानंतरही पाऊस कमी प्रमाणात आला. त्यामुळे झाडांना वाढीसाठी वाव मिळाला नाही. त्यातच यावर्षीसुद्धा बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी कापसावर कीटकनाशकांची फवारणी केली. परिणामी कीटकनाशकांच्या मात्रा अधिक झाल्याने झाडांची वाढ खुंटली. झाडांचा पसारा न वाढल्याने बोंडांची संख्या कमी झाली आहे. परिणामी यावर्षी बोंडअळीचा प्रकोप नसूनही कापसाचे उत्पादन घटले आहे. उलट शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशकांवर खर्च केल्याने मशागतखर्चात वाढ झाली आहे. कापसाला प्रतिक्विंटल किमान आठ हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस