शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

गडकरींनी हात वर केले तर बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

अनिल कडू परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग ...

अनिल कडू

परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग दुर्लक्षित आहे. खड्ड्यांसह अपघाताची मालिका सालाबादाप्रमाणे यंदाही सुरू झाली आहे. हा रस्ता लोकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या अनुषंगाने नितीन गडकरींनी आपले हात वर केले, बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविळ्याने ही समस्या नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे.

माजी खासदार अनंत गुढे यांच्या पत्राला उत्तर देताना हा राज्य महामार्ग महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडीकडे मेंटेनन्सकरिता असल्याचे त्यांनी ३० जूनच्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एशियन डेवलपमेंट बँक(एडीबी )अंतर्गत या रस्त्याचे मार्गी लागलेले काम काढून घेतले आहे. यात अमरावती जिल्ह्यात एडीबीला अधिक लांबीचे रस्ते दिल्याचे कारण पुढे केले गेले. या मार्गाचे काम हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत घेण्यास सुचविले आहे.

अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे ५४ किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास तत्त्वतः मान्यताही दिली. रस्त्याचे सर्वेक्षण 1१२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिले. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनवला. जवळपास साडे सहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या अंतिम टप्प्यात होते.

बॉक्सर

स्ता २०१५ पासून रखडला

या मार्गाचा प्रश्न २०१५ पासून रखडला आहे. २०१५ ला हा मार्ग दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्गबाबत प्रस्तावित केला गेला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून विकास आराखडा मंजूर केले गेले. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडून या रस्त्यावर कुठलेही काम न घेण्याचे निर्देश अचलपूर बांधकाम विभागाला दिल्या गेले. पण, पुढे मांजर आडवी गेल्यामुळे हा रस्ता व प्रस्ताव मागे पडला. यानंतर सन २०१८ मध्ये हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे दिला गेला. पण यातही मांजर आडवी गेली आणि रस्त्याचे काम रखडले.

--

रस्त्याचे आयुष्य संपले

अमरावती-परतवाडा हा आंतरराज्य महामार्ग ब्रिटिशकालीन आहे. त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे. १८७५ ते १८८० च्या दरम्यान बांधल्या गेलेल्या या मार्गाचे आयुष्याच संपले आहे.

--

खड्डे कोण बुजविणार?

या मार्गावर परतवाडा ते पूर्णानगर दरम्यान लक्षवेधक गड्डे पडले आहेत. रस्ता कमी आणि खड्डेच अधिक आहेत. हा रस्ता मेंटेनन्स करिता रिद्धपूर येथील एका कंत्राटदाराकडे दिला आहे. पण, त्याने अजूनही रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला सुरुवात केलेली नाही.

दिनांक/02/09/21. फोटो