शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

गडकरींनी हात वर केले तर बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:16 IST

अनिल कडू परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग ...

अनिल कडू

परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग दुर्लक्षित आहे. खड्ड्यांसह अपघाताची मालिका सालाबादाप्रमाणे यंदाही सुरू झाली आहे. हा रस्ता लोकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या अनुषंगाने नितीन गडकरींनी आपले हात वर केले, बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविळ्याने ही समस्या नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे.

माजी खासदार अनंत गुढे यांच्या पत्राला उत्तर देताना हा राज्य महामार्ग महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडीकडे मेंटेनन्सकरिता असल्याचे त्यांनी ३० जूनच्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एशियन डेवलपमेंट बँक(एडीबी )अंतर्गत या रस्त्याचे मार्गी लागलेले काम काढून घेतले आहे. यात अमरावती जिल्ह्यात एडीबीला अधिक लांबीचे रस्ते दिल्याचे कारण पुढे केले गेले. या मार्गाचे काम हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत घेण्यास सुचविले आहे.

अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे ५४ किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास तत्त्वतः मान्यताही दिली. रस्त्याचे सर्वेक्षण 1१२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिले. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनवला. जवळपास साडे सहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या अंतिम टप्प्यात होते.

बॉक्सर

स्ता २०१५ पासून रखडला

या मार्गाचा प्रश्न २०१५ पासून रखडला आहे. २०१५ ला हा मार्ग दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्गबाबत प्रस्तावित केला गेला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून विकास आराखडा मंजूर केले गेले. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडून या रस्त्यावर कुठलेही काम न घेण्याचे निर्देश अचलपूर बांधकाम विभागाला दिल्या गेले. पण, पुढे मांजर आडवी गेल्यामुळे हा रस्ता व प्रस्ताव मागे पडला. यानंतर सन २०१८ मध्ये हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे दिला गेला. पण यातही मांजर आडवी गेली आणि रस्त्याचे काम रखडले.

--

रस्त्याचे आयुष्य संपले

अमरावती-परतवाडा हा आंतरराज्य महामार्ग ब्रिटिशकालीन आहे. त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे. १८७५ ते १८८० च्या दरम्यान बांधल्या गेलेल्या या मार्गाचे आयुष्याच संपले आहे.

--

खड्डे कोण बुजविणार?

या मार्गावर परतवाडा ते पूर्णानगर दरम्यान लक्षवेधक गड्डे पडले आहेत. रस्ता कमी आणि खड्डेच अधिक आहेत. हा रस्ता मेंटेनन्स करिता रिद्धपूर येथील एका कंत्राटदाराकडे दिला आहे. पण, त्याने अजूनही रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला सुरुवात केलेली नाही.

दिनांक/02/09/21. फोटो