शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा? शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत

By गणेश वासनिक | Updated: July 9, 2024 21:07 IST

शासनाचे वेळकाढू धोरण, नवे आदेश निर्गमित नाहीच

अमरावती : राज्य शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यात खोडा घातल्याने गतिमान प्रशासनात चलबिचल निर्माण झाल्याचे दिसून येते. आर्थिक भार टाळण्यासाठी शासनाने बदल्यांकडे दुर्लक्ष केले असून ३९ विभागांतील हजारो प्रशासकीय बदल्या केव्हा होणार, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात. मात्र, यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणारी आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविण्यात आले नाही. जुलै महिना उजाडला असताना राज्य शासनाकडून बदलीसंदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना आहे.आता तरी बदलीसंदर्भात आदेश जारी व्हावेतलोकसभा निवडणूक आटोपताच ६ जून २०२४ रोजी रोजी भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आटोपली आहे. किंबहुना आता तरी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बदलीबाबत सुधारित आदेश जारी करावेत, अशी मागणी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे.बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे ‘वेट अँड वॉच’राज्यात प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागानुसार यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदलीसंदर्भातील नवे आदेश जारी करण्यात आले नाहीत. त्यामुळे ३९ विभागांच्या प्रमुखांनी बदलीची यादी तयार केली असली तरी तूर्तास बदलीपात्र कर्मचाऱ्यांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ अशी आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी