शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रशासकीय बदल्या होणार केव्हा? शेकडो कर्मचारी प्रतीक्षेत

By गणेश वासनिक | Updated: July 9, 2024 21:07 IST

शासनाचे वेळकाढू धोरण, नवे आदेश निर्गमित नाहीच

अमरावती : राज्य शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यात खोडा घातल्याने गतिमान प्रशासनात चलबिचल निर्माण झाल्याचे दिसून येते. आर्थिक भार टाळण्यासाठी शासनाने बदल्यांकडे दुर्लक्ष केले असून ३९ विभागांतील हजारो प्रशासकीय बदल्या केव्हा होणार, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम २००५ मधील तरतुदीप्रमाणे बदली करण्यास सक्षम असलेले प्राधिकरण दरवर्षी मे महिन्याच्या अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतात. मात्र, यंदा झालेल्या लोकसभा निवडणुका आणि मे महिन्यात लागू असणारी आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केल्यानंतरही बदली धोरण राबविण्यात आले नाही. जुलै महिना उजाडला असताना राज्य शासनाकडून बदलीसंदर्भातील नव्या आदेशाची प्रतीक्षा पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना आहे.आता तरी बदलीसंदर्भात आदेश जारी व्हावेतलोकसभा निवडणूक आटोपताच ६ जून २०२४ रोजी रोजी भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता मुंबई, कोकण व नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आटोपली आहे. किंबहुना आता तरी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बदलीबाबत सुधारित आदेश जारी करावेत, अशी मागणी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केली आहे.बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे ‘वेट अँड वॉच’राज्यात प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागानुसार यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदलीसंदर्भातील नवे आदेश जारी करण्यात आले नाहीत. त्यामुळे ३९ विभागांच्या प्रमुखांनी बदलीची यादी तयार केली असली तरी तूर्तास बदलीपात्र कर्मचाऱ्यांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ अशी आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी