शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘प्रियदर्शनी’चा घोळ निस्तरणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:01 IST

विकासक वासुदेव खेमचंदानी यांचेसोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौ.मी जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकासक करेल व त्याचे भाडे १ रुपया चौरस फूट प्रतिमाह असेल. याविषयी महापालिकेने १ एप्रिल १९९३ रोजी गाळे वाटपाच्या अनुषंगाने करारनामा केला.

ठळक मुद्देधोरणात्मक निर्णय हवा : महापालिकेच्या सर्व संकुलांना एकच न्याय का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या मध्यवस्तीतील जयस्तंभ चौकात असलेल्या प्रियदर्शनी मार्केटचे भाडे निश्चित करताना अटकाव होत आहे. यामुळे निर्र्माण होणारे तांत्रिक पेच महापालिका प्रशासनाला गुंतागुंतीचे ठरत आहे. उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दबाव झुगारण्याची गरज आहे.विकासक वासुदेव खेमचंदानी यांचेसोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौ.मी जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकासक करेल व त्याचे भाडे १ रुपया चौरस फूट प्रतिमाह असेल. याविषयी महापालिकेने १ एप्रिल १९९३ रोजी गाळे वाटपाच्या अनुषंगाने करारनामा केला. ही मुदत संपुष्टात आल्याने नव्याने करारनामा करण्याबाबतचा विषय आला. महापालिकेने सध्याच्या रेडीरेकनरनुसार करारनामा करण्यास सुचविले असता विकासक व गाळेधारकांनी नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे अपील केली होती.नगरविकास राज्यमंत्र्यांनी दुकानदारांचा प्रस्ताव प्राप्त करून प्रकरणातील यापूर्वीचे करारनामे, कायदे व नियमातील तरतुदी व प्राप्त प्रस्ताव तपासून नव्याने कारवाई करावी व आवश्यकतेनुसार शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, असे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने दुकानदारांचा प्राप्त प्रस्ताव प्रथम स्थायी समितीकडे आला. त्याला ७७४ रुपये चौरसमीटर दराप्रमाणे मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव १६ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेसमोर आला असताना अपवाद वगळता बहुतेक सदस्यांनी याला कडाडून विरोध केल्याने महापालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.उत्पन्नाचे स्रोत बळकट केव्हा करणार?महापालिकेचे शहरात २७ व्यापारी संकुल आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोतापैकी हा एक स्त्रोत आहे. त्यामुळे विशेष अनुदानावर विसंबून न राहता महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करावे लागणार आहे. त्यामुळे इतर व्यापारी संकुलास जो न्याय, तोच न्याय आता प्रियदर्शनी संकुलास लावावा, ही नगरसेवकांची मागणी रास्त आहे. यासाठी महापालिकेनेही आता कुठल्याही दबावाला न जुमानता उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्याची गरज आहे.जुन्या ठरावाचे विखंडन महत्त्वाचेगाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील केल्यानंतर यापूर्वीच्या २६ सप्टेंबर २०१७ च्या बैठकीत झालेला ठराव विखंडित करण्यासाठी आयुक्तांनी शासनाकडे पाठविलेला आहे. तत्कालीन अधीक्षकांनी पुढील २५ वर्षांकरिता १ रुपया चौरस फुटाप्रमाणे दर महापालिकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत आयुक्तांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.या व्यापार संकुला संदर्भात शासनाचे मत मागविले आहे. तोवर थांबवावे लागणार आहे. त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊ. हा विषय बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. लवकरच निकाली काढू.- चेतन गावंडे,महापौर

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका