स्मार्ट ग्राम पुरस्काराचा मुहूर्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:38+5:302021-02-09T04:14:38+5:30

ग्रामपंचायतींना मिळणार १० लाखांचे बक्षीस, जिल्हा, तालुकास्तरावर प्रत्येकी एक मानकरी अमरावती : निवडणूक पार पडल्यानंतर आता ग्रामपंचायतींना राज्य शासनाच्या ...

When is the moment of Smart Village Award? | स्मार्ट ग्राम पुरस्काराचा मुहूर्त केव्हा?

स्मार्ट ग्राम पुरस्काराचा मुहूर्त केव्हा?

ग्रामपंचायतींना मिळणार १० लाखांचे बक्षीस, जिल्हा, तालुकास्तरावर प्रत्येकी एक मानकरी

अमरावती : निवडणूक पार पडल्यानंतर आता ग्रामपंचायतींना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेतील पुरस्कारांचे वेध लागले आहेत. जिल्हास्तरीय पुरस्कार ४० लाख रुपयांचा आहे. तालुकास्तरावर प्रत्येकी एका ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये पुरस्कार रक्कम मिळणार आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे वितरण होते. ग्रामविकास विभागाने २१ नोव्हेंबर २०१८ पासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरांवर स्मार्ट ग्राम योजनेचा पुरस्कार सुरू केला. स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, पारंपरिक ऊर्जा, पर्यावरण व पारदर्शकता, तंत्रज्ञान, शाळा प्रयोगशाळा, वृक्षारोपण, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी आरोग्य, अंगणवाडी अशा निकषांवर योजनेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार दिला जातो . सन २०१९-२० मध्ये १४ तालुक्यांतील निवडक ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेतला. मात्र, कोरोनामुळे जिल्हा परिषदेकडून कोण्याही ग्रामपंचायतीचे परीक्षण करण्यात आलेले नव्हते. अशातच आता या ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय मूल्यमापन सुरू आहे. सदर मूल्यमापानाची प्रक्रिया आटोपताच स्मार्ट ग्राम योजनेतील पुरस्काराच्या वितरणाबाबत याच महिन्यात कार्यवाही केली जाणार असल्याचे पंचायत विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

प्रमाणपत्र मिळणार, पुरस्काराची रक्कम अप्राप्त

स्मार्ट ग्राम योजनेतील पुरस्कारासाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना केवळ प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागणार आहे.

Web Title: When is the moment of Smart Village Award?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.