शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यात ‘पेसा’ क्षेत्रातील नगरपंचायती, नगर परिषदेसाठी कायदा केव्हा?

By गणेश वासनिक | Updated: November 28, 2024 15:52 IST

ट्रायबल फोरमची केंद्र सरकारकडे मागणी : पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे

अमरावती : राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने अस्तित्वात असलेल्या पेसा क्षेत्रातील अनेक ग्रामपंचायती, नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. परंतु पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या नगरपंचायती व नगर परिषदेच्या कारभाराबाबत संसदेने आजपर्यंत स्वतंत्र कायदा केला नसल्यामुळे त्या घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर ठरतात. त्यामुळे संसदेने ‘पेसा’ क्षेत्रातील नगरपंचायत, नगर परिषदांसाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे.

देशामध्ये आदिवासीबहुल लोकसंख्या असलेले अनुसूचित क्षेत्र हे पेसा क्षेत्र म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रासाठी घटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ग’ नुसार नगरपरिषद संबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ - क मधील अनुच्छेद २४३ थ ते अनुच्छेद २४३ ‘य’, ‘ख’ मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती कायदेशीर ठरू शकत नाही. भारतीय संविधानात ७४वी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. अधिनियम १९९२ अन्वये नगरपरिषद कारभाराबाबत राज्यघटनेत भाग नऊ-कचा समावेश केलेला आहे. अनुसूचित क्षेत्रातील तालुका मुख्यालयांचे राज्यघटनेतील भाग नऊ-क मधील अनुच्छेद २४३ ‘थ’ नुसार नगरपंचायतीमध्ये रूपांतर केलेले आहे. राज्य घटनेतील भाग नऊ -‘क’ च्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रासाठी लागू करण्यासाठी अपवाद व योग्य सुधारणासह कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहेत. परंतु नगर परिषद संबंधी संसदेने अनुच्छेद २४३ ‘य’, ‘ग’ अंतर्गत कायदाच केला नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांचे रूपांतर शहरात व नगरपंचायतमध्ये करताना राज्यघटनेचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप केला आहे.

" देशाच्या राज्यघटनेचे वय ७५ वर्षे झाले आहे. लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी ४७ जागा राखीव आहे. आदिवासी खासदार आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र आपल्याच समाजासाठी राज्यघटनेत असलेली पाचवी अनुसूची आणि तद्अनुषंगाने ‘पेसा’ कायद्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, हे आदिवासी समाजाचे दुर्भाग्य आहे."- ॲड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद