शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

राज्यात ‘पेसा’ क्षेत्रातील नगरपंचायती, नगर परिषदेसाठी कायदा केव्हा?

By गणेश वासनिक | Updated: November 28, 2024 15:52 IST

ट्रायबल फोरमची केंद्र सरकारकडे मागणी : पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे

अमरावती : राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने अस्तित्वात असलेल्या पेसा क्षेत्रातील अनेक ग्रामपंचायती, नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. परंतु पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या नगरपंचायती व नगर परिषदेच्या कारभाराबाबत संसदेने आजपर्यंत स्वतंत्र कायदा केला नसल्यामुळे त्या घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर ठरतात. त्यामुळे संसदेने ‘पेसा’ क्षेत्रातील नगरपंचायत, नगर परिषदांसाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे.

देशामध्ये आदिवासीबहुल लोकसंख्या असलेले अनुसूचित क्षेत्र हे पेसा क्षेत्र म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रासाठी घटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ग’ नुसार नगरपरिषद संबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ - क मधील अनुच्छेद २४३ थ ते अनुच्छेद २४३ ‘य’, ‘ख’ मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती कायदेशीर ठरू शकत नाही. भारतीय संविधानात ७४वी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. अधिनियम १९९२ अन्वये नगरपरिषद कारभाराबाबत राज्यघटनेत भाग नऊ-कचा समावेश केलेला आहे. अनुसूचित क्षेत्रातील तालुका मुख्यालयांचे राज्यघटनेतील भाग नऊ-क मधील अनुच्छेद २४३ ‘थ’ नुसार नगरपंचायतीमध्ये रूपांतर केलेले आहे. राज्य घटनेतील भाग नऊ -‘क’ च्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रासाठी लागू करण्यासाठी अपवाद व योग्य सुधारणासह कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहेत. परंतु नगर परिषद संबंधी संसदेने अनुच्छेद २४३ ‘य’, ‘ग’ अंतर्गत कायदाच केला नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांचे रूपांतर शहरात व नगरपंचायतमध्ये करताना राज्यघटनेचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप केला आहे.

" देशाच्या राज्यघटनेचे वय ७५ वर्षे झाले आहे. लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी ४७ जागा राखीव आहे. आदिवासी खासदार आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र आपल्याच समाजासाठी राज्यघटनेत असलेली पाचवी अनुसूची आणि तद्अनुषंगाने ‘पेसा’ कायद्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, हे आदिवासी समाजाचे दुर्भाग्य आहे."- ॲड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद