शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सांगा विदर्भासाठी विजेचा रास्त दर कोणता?

By admin | Updated: August 2, 2015 00:36 IST

विजेच्या बाबतीत विदर्भाच्या नैसर्गिक संसाधनांचे (जमीन, पाणी, कोळसा) उर्वरित महाराष्ट्रात साठ वर्षांपासून शोषण होत आहे.

अमरावती : विजेच्या बाबतीत विदर्भाच्या नैसर्गिक संसाधनांचे (जमीन, पाणी, कोळसा) उर्वरित महाराष्ट्रात साठ वर्षांपासून शोषण होत आहे. निर्मित विजेपैकी विदर्भाला अगदी कमी हिस्सा दिला गेला. आजही विदर्भाच्या उत्पादनातील एक तृतीयांश हिस्सा विदर्भातील शेती, उद्योग व घरगुती उपयोगासाठी मिळत आहे. मात्र राज्याच्या वीज उपयोगाचा सरासरी खर्च दर युनिट विदर्भाच्या उपभोक्त्यावर लावला जातो. उत्पादनाच्या जोडीने हे खर्च लावल्याने येथील लोकांना वीज महाग पडते. मग विदर्भासाठी विजेची रास्त किंमत कोणती, असा सवाल करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने इर्विन चौकात निदर्शने करण्यात आली. विदर्भातील उद्योगांना अपुरा पुरवठा व न परवडणारे उच्च दर, विदर्भातील शेतीला १६ तासांचे विद्युत भारनियमन या समस्यांनी विदर्भवासी ग्रासलेले आहे. मात्र विदर्भातील विजेची मागणीच नाही, असे सांगितले. जावून विदर्भाची वीज विदर्भाबाहेर पाठविली जाते, असे निवेदनात नमूद आहे. वीज गळती, वीज चोरी, अती खोल बोअरवेलमधून उपश्याचे उंच प्रदेशात पंपींग करून पाणी चढविण्याचे राज्यभऱ्यातील खर्च, आवश्यक खर्च आहे असे मानून त्याचा सरासरी खर्च दर युनिट खर्च विदर्भाच्या उपभोक्त्यावर मानल्या जात असल्याने विदर्भातील वीज महाग पडते त्यामुळे विदर्भासाठी रास्त दर कोणता? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे. या आंदोलनात वेगळ्या विदर्भाची शपथ घेण्यात येवून वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी जगदिश नाना बोंडे, राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे, पुरूषोत्तम बनसोड, श्रीकांत पाटील, अशोक वानखडे, सुभाष धोटे, पी. पी. लोणारे, प्रकाश शिरभाते, राजाभाऊ तायवाडे, ज्ञानेश्वर गादे आदी उपस्थित होते.