शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:29 IST

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

अमरावती - रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती पाण्यात जलविहार करणार, असा शेतक-यांचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञांनीही २५ जूनपासून मान्सून व-हाडात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या शिवारात पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे. यंदा ३१ लाख ६४ हजार ४१८ हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गतवर्षीचा खरीप सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे बाधित झाला. यंदा १२ ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली, आता तो राज्यात प्रवेशित झाल्यामुळे शेतकºयांमध्ये उत्साह संचारला असून, शेतशिवारात कामांची लगबग सुरू झालेली आहे. यंदाच्या खरिपासाठी अमरावती जिल्ह्यात ७,२८,११२ हेक्टर, बुलडाणा ६,६५,५९६, अकोला ४,८२,६२०, वाशिम ३,९९,६६९ व यवतमाळ जिल्ह्यात ८,८८,४२१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने आणखी १० ते १५ दिवस दांडी मारल्यास मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीत रूपांतरित होणार आहे.यंदा सर्वाधिक १३,६४,८०४ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३,७५०४६ हेक्टर क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात राहील, अकोला १,११,६१०, वाशीम २,८३,१३७, अमरावती ३,२३,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,७२,७११ हेक्टर राहणार आहे. संकरित कपाशीचे यंदा ९,६९,०५७ हेक्टर  व सुधारित कपाशीचे १७,५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. संकरित ज्वार १,४४,५१८ हेक्टर, संकरित बाजरा २,००८ हेक्टर, मका १९,३०३ हेक्टर, तूर ४,२९,८९८ हेक्टर, मूग १,३३,८२७, उडीद ६४,५३६ हेक्टर, भुईमूग १,६४८ हेक्टर, सूर्यफूल ६,७२९ हेक्टर, तीळ ४८७३ हेक्टर तसेच धान व इतर पिकांचे ५,५८९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.

यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी खरिपासाठी यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये ३,४८५ क्विंटल संकरित ज्वार, बाजरा २ क्विंटल, मका १००, तूर १०,५११, मूग २,२६९, उडीद ३,८९०, सूर्यफूल २, तीळ १३, सोयाबीन २,७८,७३०, संकरित कापूस २,७८,७३० व सुधारित कापसाचे १३ क्विंटल बियाणे लागणार आहेत. यंदा सार्वजनिक क्षेत्रातून ३,१८,०८९ क्विंटल खासगी ३,२२,३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीजद्वारा २,९९,५८९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खरिपासाठी ६,७४,१४० मे.टन खतांची मागणी यंदाच्या खरीप हंगामासाठी ६,७४,१४० मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये युरिया २,१४,५०९ मे.टन, डीएपी १,०७,५३७, एमओपी ३९,४७१, एसएसपी १,०३,७९३ व कॉप्लेक्समध्ये २,०८,८२९ मे.टन खतांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ५,५२,४७५ मे.टन खतांचे आवंटन आहे. यामध्ये युरिया १,८६,००० मे.टन, डीएपी ८०४१०, एमओपी ३४,४३५, एसएसपी ९१,२१० व कॉप्लेक्सेसमध्ये १,६०२४० मे.टन खतांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती