शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:09 IST

सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली टँकर अन् विहीर अधिग्रहणाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. तात्पुरता उपाय म्हणून २,७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.अमरावती विभागात पाच वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये सरासरीच्या ८३ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७१.५ टक्के, २०१६ मध्ये १०९.०९ टक्के, २०१७ मध्ये ७६ टक्के, तर २०१८ मध्ये ८५.०४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सलग दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाईचे दुष्टचक्र सुरू आहे. जलयुक्त शिवारची ६० हजारांवर कामे या चार वर्षांत झाली. मात्र, प्रशासनात नियोजनाचा दुष्काळ असल्याने यंदा पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. शासनाच्याच आरखड्यानुसार यंदा वºहाडातील ३,७३३ गावांत भीषण पाणीटंचाई आहे.पाणीटंचाई निवारणार्थ यंदा अमरावती जिल्ह्यात १९८१, अकोला ५६९, यवतमाळ ७५५, बुलडाणा २१६७ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात यापैकी ३४९९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. त्यातुलनेत ४९५ उपाययोजना प्रगतीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार ३००४ उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांसाठी ५३.७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी ७.३७ कोटी, नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी २.१९ कोटी, तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ३.०२ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८.६५ कोटी, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी १२.४९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.४५२ टँकरचा आजपर्यंतचा विक्रमपाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून पश्चिम विदर्भात ४५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा आतापर्यंतचा रेकार्ड असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६४ टँकर सध्या सुरू आहे. अमरावती ५४, अकोला ३६ यवतमाळ ४३ व वाशिम जिल्ह्यात ५५ टँकर सुरू आहे. यापूवी २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ११३ टँकर व १०७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते, तर २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ३४४ टँकर व १८४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.२७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून विभागात सद्यस्थितीत २७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. हीदेखील विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक ९८७ खासगी विहिरींचे अधिग्रहण बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. अमरावती ५६५, अकोला २७०, यवतमाळ ६६४ व वाशिम जिल्ह्यात २५० विहिरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने अधिग्रहित केलेल्या विहिरींनादेखील कोरड लागल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई