शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:09 IST

सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली टँकर अन् विहीर अधिग्रहणाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. तात्पुरता उपाय म्हणून २,७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.अमरावती विभागात पाच वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये सरासरीच्या ८३ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७१.५ टक्के, २०१६ मध्ये १०९.०९ टक्के, २०१७ मध्ये ७६ टक्के, तर २०१८ मध्ये ८५.०४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सलग दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाईचे दुष्टचक्र सुरू आहे. जलयुक्त शिवारची ६० हजारांवर कामे या चार वर्षांत झाली. मात्र, प्रशासनात नियोजनाचा दुष्काळ असल्याने यंदा पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. शासनाच्याच आरखड्यानुसार यंदा वºहाडातील ३,७३३ गावांत भीषण पाणीटंचाई आहे.पाणीटंचाई निवारणार्थ यंदा अमरावती जिल्ह्यात १९८१, अकोला ५६९, यवतमाळ ७५५, बुलडाणा २१६७ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात यापैकी ३४९९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. त्यातुलनेत ४९५ उपाययोजना प्रगतीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार ३००४ उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांसाठी ५३.७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी ७.३७ कोटी, नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी २.१९ कोटी, तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ३.०२ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८.६५ कोटी, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी १२.४९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.४५२ टँकरचा आजपर्यंतचा विक्रमपाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून पश्चिम विदर्भात ४५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा आतापर्यंतचा रेकार्ड असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६४ टँकर सध्या सुरू आहे. अमरावती ५४, अकोला ३६ यवतमाळ ४३ व वाशिम जिल्ह्यात ५५ टँकर सुरू आहे. यापूवी २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ११३ टँकर व १०७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते, तर २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ३४४ टँकर व १८४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.२७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून विभागात सद्यस्थितीत २७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. हीदेखील विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक ९८७ खासगी विहिरींचे अधिग्रहण बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. अमरावती ५६५, अकोला २७०, यवतमाळ ६६४ व वाशिम जिल्ह्यात २५० विहिरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने अधिग्रहित केलेल्या विहिरींनादेखील कोरड लागल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई