शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
4
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
5
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
6
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
7
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
8
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
9
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
10
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
11
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
12
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
13
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
14
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
15
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
16
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
17
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
18
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
19
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
20
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:09 IST

सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली टँकर अन् विहीर अधिग्रहणाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. तात्पुरता उपाय म्हणून २,७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.अमरावती विभागात पाच वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये सरासरीच्या ८३ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७१.५ टक्के, २०१६ मध्ये १०९.०९ टक्के, २०१७ मध्ये ७६ टक्के, तर २०१८ मध्ये ८५.०४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सलग दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाईचे दुष्टचक्र सुरू आहे. जलयुक्त शिवारची ६० हजारांवर कामे या चार वर्षांत झाली. मात्र, प्रशासनात नियोजनाचा दुष्काळ असल्याने यंदा पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. शासनाच्याच आरखड्यानुसार यंदा वºहाडातील ३,७३३ गावांत भीषण पाणीटंचाई आहे.पाणीटंचाई निवारणार्थ यंदा अमरावती जिल्ह्यात १९८१, अकोला ५६९, यवतमाळ ७५५, बुलडाणा २१६७ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात यापैकी ३४९९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. त्यातुलनेत ४९५ उपाययोजना प्रगतीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार ३००४ उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांसाठी ५३.७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी ७.३७ कोटी, नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी २.१९ कोटी, तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ३.०२ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८.६५ कोटी, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी १२.४९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.४५२ टँकरचा आजपर्यंतचा विक्रमपाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून पश्चिम विदर्भात ४५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा आतापर्यंतचा रेकार्ड असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६४ टँकर सध्या सुरू आहे. अमरावती ५४, अकोला ३६ यवतमाळ ४३ व वाशिम जिल्ह्यात ५५ टँकर सुरू आहे. यापूवी २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ११३ टँकर व १०७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते, तर २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ३४४ टँकर व १८४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.२७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून विभागात सद्यस्थितीत २७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. हीदेखील विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक ९८७ खासगी विहिरींचे अधिग्रहण बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. अमरावती ५६५, अकोला २७०, यवतमाळ ६६४ व वाशिम जिल्ह्यात २५० विहिरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने अधिग्रहित केलेल्या विहिरींनादेखील कोरड लागल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई