शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या; शासनाची अभिनव योजना

By गणेश वासनिक | Updated: October 14, 2023 17:31 IST

राज्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील ११२ विद्यार्थ्यांची निवड; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पुढाकार

अमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातून ११२ विद्यार्थ्यांची नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्थेत निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी पदव्युत्तर, पदवी आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहे. आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या, अशी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची अभिनव योजना आहे. शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी, निकषांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी रक्कम समाज कल्याण आयुक्तांना देण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. परदेशातशिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण संपल्यानंतर देशाचे सेवा करण्यासाठी हमीपत्र द्यावे लागते. निवड झालेल्या शैक्षणिक संस्थेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. परस्पर बदल केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम परत घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता व ईतर अनुषंगीक खर्च शिष्यवृत्तीच्या रक्कमेत समाविष्ट करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी हे यूके, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूयार्क, फिलीपाईन्स या देशात उच्च शिक्षण घेणार आहेत.

अशी झाली विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती निवड

पदव्युत्तर पदवी कला- २, पदव्युत्तर पदवी वाणिज्य- २,पदव्युत्तर पदवी विज्ञान- २, पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी- २४, पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन - ११, पदव्युत्तर पदवी विधी - ५, पीएचडी कला - ३, पीएचडी विज्ञान - ५, पीएचडी अभियांत्रिकी - ५

आंतरपरिवर्तनाने निवडपदव्युत्तर पदवी पीजी - १४, पदव्युत्तर पदवी पीएचडी - ०१

सर्वसाधारण प्रतीक्षा यादीपदव्युत्तर पदवी पीजी -३८

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना ही गरीब, सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परिवर्तनाची नांदी ठरत आहे. त्यांच्या आई-वडिलांनी परदेशात शिक्षण हे केवळ स्वप्न बघितले होते. मात्र या योजनेद्वारे परदेशात प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यंदा अमरावती विभागातून तीन विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत.

- सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी