शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:19 AM

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सत्यमेव जयते स्पर्धा; प्रथम दहा लाख, द्वितीय सहा लाख, तृतीय बक्षीस चार लाखांचे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.मेळघाटातील धारणी, चिखलदरा हे दोन्ही तालुके यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यातील १२६ व धारणी तालुक्यातील १०६ अशा २३२ गावांनी यासंबंधी प्रशिक्षण घेतले. पैकी सहा गावांना पुरस्कार मिळाले. धारणी तालुक्यातील बोथरा, बेरदाबल्डा द्वितीय, तर दहेंडा गाव तिसºया क्रमांकावर राहिले. चिखलदरा तालुक्यातील आवागडला प्रथम, बामादेहीला द्वितीय व कुलंगणा (बु) गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. बीडीओ देशमुख, तहसीलदार खाडे, तांत्रिक अधिकारी अमोल बोंडे, अनिल भिलवे, आरएफओ हिरालाल चौधरी, वनरक्षक अरुण डाखोरे, कृषी अधिकारी अरुण बेठेकर, चिखलदरा तहसीलदार मनीष गायकवाड, कृषी अधिकारी पठाळे, डीएफओ पीयूषा जगताप, वनपाल अभय चंदेले, तांत्रिक अधिकारी प्रमोद नागले, नारायण आठवले आदींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.मेळघाटात टँकरमुक्तीचा संदेशवॉटर कप स्पर्धेमुळे मेळघाटातील आदिवासी पाण्यासाठी जागरूक झाले आहेत. जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी २५० पेक्षा अधिक गावांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग आदिवासींमध्ये जागृती आणणारा ठरला आहे मेळघाटातील सहा गावांनी जलसंधारणात उत्कृष्ट काम करुन टँकरमुक्तीचा संदेश दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीMelghatमेळघाट