शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:06 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे मोर्शीनजीकच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला होणाºया ....

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त : मजीप्राचा पाणी कपातीचा प्रस्ताव मान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे मोर्शीनजीकच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सोमवार ११ सप्टेंबरपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महापालिकेत यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. याबैठकीत पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती शहराला सिंभोरा येथील अप्परवर्धा धरणातून दररोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणाची क्षमता असतानाही शहरावासियांना १२५ दशलक्ष लीटर्सच्या जवळपास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा ताण वाढला आहे. त्यातच उंचावरील भागात राहणाºया नागरिकांना पुसेसा पाणी पुरवठा होत नसल्याची ओरडही सुरूच असते.काही भागातील नागरिकांना तर रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत धरणाची पातळी ३३९.४२ मीटर असून धरणात ५७ टक्केच पाणीसाठा आहे. पावसाळ्यात धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, त्यातुलनेत यंदा मोठी तफावत दिसत आहे.मजिप्राक डून प्राप्त पाणीकपातीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. १७ झोनमध्ये पाणी पुरवठ्याचे शेड्युल तयार झाले आहे.-हेमंत पवार, आयुक्त, महापालिकायंदा पर्जन्यमान कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीकपात करणे आवश्यक आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक महापालिकेला दिले असून त्यावर ते लवकरच निर्णय देणार आहेत.-सुरेंद्र कोपुलवार,कार्यकारी अभियंता, मजीप्रा.