शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:24 IST

तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : सिंभोरा ते नेरपिंगळाई ३३ किमी नवीन पाइपलाइनचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले. वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही आभार व्यक्त केले. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही दिवस-रात्र एक करून फुटलेल्या पाइप लाइनच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळेच गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला. उर्वरित पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत होणार आहे.सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंतची मुख्य जलवाहिनी कालबाह्य झाल्यामुळे ती पाण्याच्या दबावामुळे फुटण्याची अधिक शक्यता आहे. सोमवारी माहुलीजवळ अचानक मुख्य जलवाहिनी फुटली आणि अमरावतीकरांसमोर जलसंकट निर्माण झाले. ही जलवाहिनी ३३ किलोमीटर लांबीची असून, ती बदलविली जाणार आहे. यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठविला जाणार आहे. कालबाह्य जलवाहिनीमुळे अनेकदा अमरावतीकरांना पाणीपुरवठा बंदची झळ सोसावी लागली. मजीप्राच्या अनियोजित कारभाराच्या परिणामी सोमवारपासून अमरावतीकरांच्या घरी नळ आले नाहीत. मजीप्राने फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर केल्याने पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे मजीप्राने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत.रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरूमाहुलीजवळील पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण होताच मजीप्राने सर्वप्रथम पाणीपुरवठ्याची चाचणी घेतली. बुधवारी रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता दुसरा पंप व त्यानंतर चारही पाणीपुरवठा करणारे पंप हळूहळू सुरू करण्यात आले. मध्यरात्री जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहोचले. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जलशुद्धीकरण केंद्रातून खालच्या भागातील टाक्यांपर्यंत पाणी पोहचविले गेले. सायंकाळी ४.३० वाजता शहरातील अर्ध्याअधिक टाक्यांमध्ये पाणीपुरवठा झाला. पाणीपातळीनुसार नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.या भागात झाला पाणीपुरवठापाइप लाइनचे काम पूर्ण होताच मजीप्राने सिंभोरा येथून तपोवन जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले. त्यानंतर गुरूवारी नागपुरी गेट, सातुर्णा, साईनगर, रुक्मिणीनगर या भागातील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री बडनेरा येथे पाणीपुरवठा केला जाईल, असे नियोजन मजीप्राने केले आहे. शुक्रवारी वडरपुरा, मायानगर, कॅम्प अशा उर्वरित भागात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई