शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:24 IST

तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : सिंभोरा ते नेरपिंगळाई ३३ किमी नवीन पाइपलाइनचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले. वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही आभार व्यक्त केले. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही दिवस-रात्र एक करून फुटलेल्या पाइप लाइनच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळेच गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला. उर्वरित पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत होणार आहे.सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंतची मुख्य जलवाहिनी कालबाह्य झाल्यामुळे ती पाण्याच्या दबावामुळे फुटण्याची अधिक शक्यता आहे. सोमवारी माहुलीजवळ अचानक मुख्य जलवाहिनी फुटली आणि अमरावतीकरांसमोर जलसंकट निर्माण झाले. ही जलवाहिनी ३३ किलोमीटर लांबीची असून, ती बदलविली जाणार आहे. यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठविला जाणार आहे. कालबाह्य जलवाहिनीमुळे अनेकदा अमरावतीकरांना पाणीपुरवठा बंदची झळ सोसावी लागली. मजीप्राच्या अनियोजित कारभाराच्या परिणामी सोमवारपासून अमरावतीकरांच्या घरी नळ आले नाहीत. मजीप्राने फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर केल्याने पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे मजीप्राने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत.रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरूमाहुलीजवळील पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण होताच मजीप्राने सर्वप्रथम पाणीपुरवठ्याची चाचणी घेतली. बुधवारी रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता दुसरा पंप व त्यानंतर चारही पाणीपुरवठा करणारे पंप हळूहळू सुरू करण्यात आले. मध्यरात्री जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहोचले. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जलशुद्धीकरण केंद्रातून खालच्या भागातील टाक्यांपर्यंत पाणी पोहचविले गेले. सायंकाळी ४.३० वाजता शहरातील अर्ध्याअधिक टाक्यांमध्ये पाणीपुरवठा झाला. पाणीपातळीनुसार नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.या भागात झाला पाणीपुरवठापाइप लाइनचे काम पूर्ण होताच मजीप्राने सिंभोरा येथून तपोवन जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले. त्यानंतर गुरूवारी नागपुरी गेट, सातुर्णा, साईनगर, रुक्मिणीनगर या भागातील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री बडनेरा येथे पाणीपुरवठा केला जाईल, असे नियोजन मजीप्राने केले आहे. शुक्रवारी वडरपुरा, मायानगर, कॅम्प अशा उर्वरित भागात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई