शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:12 IST

अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

ठळक मुद्देचिंचखेड येथे मोठा बिघाड : ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या पी.एस.सी (सिमेंट) गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड नजीक मोठ्या स्वरूपात गळती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीेसाठी किमान तीन दिवस लागतील, असा प्राथमिक अंदाज मजीप्राने व्यक्त केला आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रात्रंदिवस दुरुस्तीचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.उन्हाळ्यापूर्वी वाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नाही, तर मोठी समस्या उद्भवण्याचे चित्र आहे. त्यामुळे मजीप्राचे जलव्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३ च्या उपविभागीय अभियंत्यांनी तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीसुद्धा हिवाळा आणि पावसाळ्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, हे विशेष. आता तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीकर नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पहिल्यांदा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.पाणी गळतीमागे कोण?सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरुत्व वाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना जलवाहिनीवर गळती होते की ती फोडली जाते, हे शोधून काढणे जीवन प्राधिकरणापुढे आव्हान आहे. गळतीतून मोठे नुकसान होते. तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उन्हाळा सुरू झाला की, जलवाहिनी फोडण्याची घटना होते. याप्रकरणी कारवाई का नाही, हासुद्धा चिंतनाचा विषय आहे.धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषयअमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंभोरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंभोरा धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. आता दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या दिवसांतील अंतरात वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे बोलले जात आहे.