शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:12 IST

अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

ठळक मुद्देचिंचखेड येथे मोठा बिघाड : ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या पी.एस.सी (सिमेंट) गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड नजीक मोठ्या स्वरूपात गळती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीेसाठी किमान तीन दिवस लागतील, असा प्राथमिक अंदाज मजीप्राने व्यक्त केला आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रात्रंदिवस दुरुस्तीचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.उन्हाळ्यापूर्वी वाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नाही, तर मोठी समस्या उद्भवण्याचे चित्र आहे. त्यामुळे मजीप्राचे जलव्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३ च्या उपविभागीय अभियंत्यांनी तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीसुद्धा हिवाळा आणि पावसाळ्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, हे विशेष. आता तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीकर नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पहिल्यांदा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.पाणी गळतीमागे कोण?सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरुत्व वाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना जलवाहिनीवर गळती होते की ती फोडली जाते, हे शोधून काढणे जीवन प्राधिकरणापुढे आव्हान आहे. गळतीतून मोठे नुकसान होते. तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उन्हाळा सुरू झाला की, जलवाहिनी फोडण्याची घटना होते. याप्रकरणी कारवाई का नाही, हासुद्धा चिंतनाचा विषय आहे.धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषयअमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंभोरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंभोरा धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. आता दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या दिवसांतील अंतरात वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे बोलले जात आहे.