शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:12 IST

अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

ठळक मुद्देचिंचखेड येथे मोठा बिघाड : ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या पी.एस.सी (सिमेंट) गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड नजीक मोठ्या स्वरूपात गळती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीेसाठी किमान तीन दिवस लागतील, असा प्राथमिक अंदाज मजीप्राने व्यक्त केला आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रात्रंदिवस दुरुस्तीचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.उन्हाळ्यापूर्वी वाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नाही, तर मोठी समस्या उद्भवण्याचे चित्र आहे. त्यामुळे मजीप्राचे जलव्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३ च्या उपविभागीय अभियंत्यांनी तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीसुद्धा हिवाळा आणि पावसाळ्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, हे विशेष. आता तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीकर नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पहिल्यांदा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.पाणी गळतीमागे कोण?सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरुत्व वाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना जलवाहिनीवर गळती होते की ती फोडली जाते, हे शोधून काढणे जीवन प्राधिकरणापुढे आव्हान आहे. गळतीतून मोठे नुकसान होते. तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उन्हाळा सुरू झाला की, जलवाहिनी फोडण्याची घटना होते. याप्रकरणी कारवाई का नाही, हासुद्धा चिंतनाचा विषय आहे.धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषयअमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंभोरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंभोरा धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. आता दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या दिवसांतील अंतरात वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे बोलले जात आहे.