शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:12 IST

अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

ठळक मुद्देचिंचखेड येथे मोठा बिघाड : ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या पी.एस.सी (सिमेंट) गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड नजीक मोठ्या स्वरूपात गळती होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीेसाठी किमान तीन दिवस लागतील, असा प्राथमिक अंदाज मजीप्राने व्यक्त केला आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रात्रंदिवस दुरुस्तीचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.उन्हाळ्यापूर्वी वाहिनीची गळती दुरुस्त करण्यात आली नाही, तर मोठी समस्या उद्भवण्याचे चित्र आहे. त्यामुळे मजीप्राचे जलव्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३ च्या उपविभागीय अभियंत्यांनी तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीसुद्धा हिवाळा आणि पावसाळ्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, हे विशेष. आता तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीकर नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पहिल्यांदा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.पाणी गळतीमागे कोण?सिंभोरा धरणातून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरुत्व वाहिनीवर सातत्याने गळती होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना जलवाहिनीवर गळती होते की ती फोडली जाते, हे शोधून काढणे जीवन प्राधिकरणापुढे आव्हान आहे. गळतीतून मोठे नुकसान होते. तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उन्हाळा सुरू झाला की, जलवाहिनी फोडण्याची घटना होते. याप्रकरणी कारवाई का नाही, हासुद्धा चिंतनाचा विषय आहे.धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषयअमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंभोरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंभोरा धरणात २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. आता दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या दिवसांतील अंतरात वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे बोलले जात आहे.