शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रखरखत्या उन्हामुळे जलस्रोत कोरडेठाक; १७ टँकर, ४८ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 11:39 IST

तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठळक मुद्दे७१ गावे तहानली, ३२ विंधन विहिरी, २९१ उपाययोजना सुरू

अमरावती : मे महिन्यातील रखरखत्या उन्हामुळे गावांगावातील जलस्रोत कोरडेठाक पडले आहे, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे १७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमध्ये २९१ उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. बारा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जमिनीत पूनर्भरण झाले व भूजलस्तर वाढला. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई उद्भवली नाही; मात्र मार्चअखेरपासून तापमान ४० अंशावर गेल्यानंतर मात्र मेळघाटातील उंचावरील गावे तहानली. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार २९१ उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

एप्रिलपश्चात ग्रामीणमधील ७५ गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यासाठी बोअरवेल, विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात १, मोर्शी ६, वरुड १, अचलपूर ७, चिखलदरा १६ व धारणी तालुक्यात १ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

याशिवाय ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४, नांदगाव खंडेश्वर १४, भातकुली १, तिवसा २, मोर्शी ५, वरुड २, चांदूर रेल्वे ११, अचलपूर १, चिखलदरा ५, धारणी २ व धामणगाव तालुक्यात १ विहिरीचा समावेश आहे.

चिखलदरा तालुक्यात १६ टँकर

जिल्ह्यात सद्यस्थितीत १७ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात आहेत. यात एकझिरा, मोथा, आकी, बगदरी, तारुबांदा, बहादरपूर, धरमडोह, लवादा, आलाडोह, रायपूर, गौलखेडा, सोमवारखेडा, नागापूर, कंडूखेडा, आवागड व खोंगडा तसेच चांदूर रेल्वे तालुक्यात सावंग्री मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

६३० पैकी २९१ उपाययोजना सुरू

कृती आराखड्यात तहानलेल्या ६३० गावांसाठी २९१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी २९१ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. वहीकामे प्रगतीत आहेत. यामध्ये ८४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ६ तात्पुरत्या पुरक नळ योजना, १७ टँकर, ८० विहिरींचे अधिग्रहण, १०४ नवीन विंधन विहिरी, कूपनलिका या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातamravati-acअमरावती