शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 18:02 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयंत्रणेद्वारा उपाययोजनांची मात्रा, टँकरसाठी निविदा

अमरावती : एप्रिलनंतरच्या तिसऱ्या टप्प्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. तापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे. यासाठीचे नियोजन या विभागाद्वारे जरा उशिरानेच करण्यात आले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यातही ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे चांगल्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण झालेले आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीत एक मीटरपर्यंत वाढ झाल्याने मार्चपर्यंत पाणी टंचाईचा प्रश्न उद्वलेला नाही. त्यामुळेच प्रशासनाचीदेखील दिरंगाईच झाल्याचा आारोप होत आहे.

मार्चअखेरीस काही गावांत पाणीटंचाई सुरू झाली व त्यानंतर प्रशासनाद्वारे सातत्याने विचारणा झाल्यानंतर प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे तयार करण्यात आला आहे. काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी व काही योजनांसाठी निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

१११ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत १११ गावांमध्ये ११५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ६२.१० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय किमान १० टँकरद्वारे दहा गावांना पाणीपुरवठा करण्याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे. ३१ गावांमध्ये ३४ नवीन विंधन विहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहेत. या सर्व उपाययोजनांवर १.३० कोटींचा निधी खर्च होणार आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई