शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पाणीटंचाई; उपाययोजना ८०० प्रस्ताावित, मंजूर फक्त ९६

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 22, 2023 17:55 IST

नळ योजनेच्या दुरुस्तीचे एकही काम सुरु नाही

अमरावती : मार्चपश्चात उन्हाची दाहकता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ८०० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात ९६ उपाययोजनांना मंजूरी मिळालेली आहे. त्यापैकी ४४ पुर्ण झाल्यात तर ४४ अद्यापही प्रगतीत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मे, जूनमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणार आहे.

जिल्ह्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व पाणी पातळीत वाढ झाली. मात्र, मार्चमध्ये चांगलेच तापायला लागल्याने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. याशिवाय काही भागात खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाद्वारा करण्यात आले.

यावर्षी नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीची १३५ कामे सुचविण्यात आलेली असतांना ५० कामे मंजूर आहेत. मात्र, एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. तात्पूरत्या पुरक नळ योजनेची १० कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी चार कामांनाच मंजुरी मिळालेली आहे. एकही काम सुरु नाही. खासगी ४२९ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतांना पाच उपाययोजनेला मंजूरी मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.तहान लागल्यावर खोदणार विहीर

पाणीटंचाईचा सामना करण्यास २०७ नवीन विंधन विहीर, कूपनलिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी ३५ ला मंजूरी मिळालेली आहे. यापैकी एकही काम सुरु झालेले नाही, त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती