शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

गावकऱ्यांच्या लढ्याला यश; सावंगी मग्रापूर दलितवस्तीत पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 11:30 IST

सावंगी मग्रापूर गावातील वॉर्ड क्र. १ मध्ये तब्बल २८ दिवस पाणीपुरवठा बंद होता. पाण्यासाठी या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर आंदोलन पुकारले होते.

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशी आंदोलन मागेजलवाहिनीचे काम युद्धस्तरावर

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावातील वॉर्ड क्र. १ मधील रहिवाशांनी घराच्या नळाला पाणी पोहोचल्याने तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेतले. एक महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने गावाबाहेर पाणीपुरवठ्याच्या स्रोताजवळ ठिय्या मांडणाऱ्या ग्रामस्थांची मागणी मान्य करीत प्रशासनाने तीव्र गतीने या वॉर्डात शुक्रवारी स्टँड पोस्ट उभारून पाणी पुरविले.

अनुसूचित जाती बहुल वॉर्ड १ मधील पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप करीत महिला-पुरुष ग्रामस्थांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री गाव सोडून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शुक्रवारी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गटविकास अधिकारी मंदार पत्की, पोलीस निरीक्षक मगन मेहते, सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमप, निवासी नायब तहसीलदार अनासाने याप्रसंगी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

आंदोलकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रात्री तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे तोडग्याला दिशा मिळाली.

वीरेंद्र जगताप यांची मध्यस्थी

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मध्यस्थीनंतर तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेण्याची चिन्हे स्पष्ट झाली. त्यांनी स्वत: उपस्थित राहून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी ग्रामस्थांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले.

आता लवकरच कायमस्वरुपी उपाययोजनेद्वारे सर्वांच्या घरगुती नळाला पाणी पोहोचले. दलित वस्तीत सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढील २४ तास चोख बंदोबस्त राहील

मंदार पत्की, गटविकास अधिकारी

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलन