शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

जलसाक्षरता मोहीम जोरात; अमरावती जिल्ह्यात ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग

By गणेश वासनिक | Updated: September 7, 2024 14:26 IST

Amravati : भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ, जिल्ह्यातील सात तालुक्यांत यशस्वी प्रयोग

अमरावती : जलसाक्षरता मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत असून गत दोन वर्षांत सात तालुक्यांतील ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यशस्वीपणे कार्यरत आहे. परिणामी सात तालुक्यांत भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

पाणी हे जीवन आहे, त्याला विनाशापासून वाचविण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. पर्यावरणातील बदलते चक्र, वाढते तापमान, बेजबाबदार दिनचर्यांमुळे मानवी जीवनातील समाजामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. आज आम्ही प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी बघतो. येणारी पिढी कदाचित छोट्याशा कॅप्सूलमध्ये पाणी बघेल. या परिस्थितीला जनसामान्यात पाण्याप्रति असलेली निरक्षरता जबाबदार आहे. निसर्गाच्या ऋतुचक्रात जितक्याही प्रमाणात पाऊस आपल्या क्षेत्रात पडतो त्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविल्यास भविष्यात पाणीटंचाई, दुष्काळ यासारख्या संकटांपासून आपण वाचू शकतो या उद्देशाने जलदूत अश्विनसिंह गौतम यांनी सन २०२२ पासून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, भातकुली, वरुड, तालुक्यातील तब्बल ६२१ गावांमध्ये जलसाक्षरता अभियान राबविले.

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम घरी तयार करण्याचे आवाहन जलसाक्षरता उपक्रमाद्वारे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील घरांमध्ये ग्रामवासीयांनी स्वखर्चाने एकूण ९४३ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभी केली. पावसाचे पाणी नाहक वाहून न जाता सरळ जमिनीत मुरतेय. यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग लावलेल्या परिसरात भूजल पातळी वाढली असल्याचे विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमाने समजून आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम भूजल पातळी वाढविण्यास प्रभावी निकाल देत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. या समस्येला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कमी खर्चाचे आणि प्रभावी उपाय आहे.

"जल है तो जीवन है, हे वास्तव आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविल्याशिवाय दुष्काळ, जलसंकटावर मात करता येणार नाही. त्यामुळे महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी नागरिकांना घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे आवश्यक आहे."- ॲड. किशोर शेळके, माजी महापौर

टॅग्स :amravati-acअमरावतीRainपाऊसWaterपाणी