शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरता मोहीम जोरात; अमरावती जिल्ह्यात ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग

By गणेश वासनिक | Updated: September 7, 2024 14:26 IST

Amravati : भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ, जिल्ह्यातील सात तालुक्यांत यशस्वी प्रयोग

अमरावती : जलसाक्षरता मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत असून गत दोन वर्षांत सात तालुक्यांतील ९४३ घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यशस्वीपणे कार्यरत आहे. परिणामी सात तालुक्यांत भूगर्भात पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

पाणी हे जीवन आहे, त्याला विनाशापासून वाचविण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. पर्यावरणातील बदलते चक्र, वाढते तापमान, बेजबाबदार दिनचर्यांमुळे मानवी जीवनातील समाजामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. आज आम्ही प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी बघतो. येणारी पिढी कदाचित छोट्याशा कॅप्सूलमध्ये पाणी बघेल. या परिस्थितीला जनसामान्यात पाण्याप्रति असलेली निरक्षरता जबाबदार आहे. निसर्गाच्या ऋतुचक्रात जितक्याही प्रमाणात पाऊस आपल्या क्षेत्रात पडतो त्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविल्यास भविष्यात पाणीटंचाई, दुष्काळ यासारख्या संकटांपासून आपण वाचू शकतो या उद्देशाने जलदूत अश्विनसिंह गौतम यांनी सन २०२२ पासून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, भातकुली, वरुड, तालुक्यातील तब्बल ६२१ गावांमध्ये जलसाक्षरता अभियान राबविले.

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम घरी तयार करण्याचे आवाहन जलसाक्षरता उपक्रमाद्वारे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील घरांमध्ये ग्रामवासीयांनी स्वखर्चाने एकूण ९४३ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभी केली. पावसाचे पाणी नाहक वाहून न जाता सरळ जमिनीत मुरतेय. यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग लावलेल्या परिसरात भूजल पातळी वाढली असल्याचे विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमाने समजून आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम भूजल पातळी वाढविण्यास प्रभावी निकाल देत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. या समस्येला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कमी खर्चाचे आणि प्रभावी उपाय आहे.

"जल है तो जीवन है, हे वास्तव आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविल्याशिवाय दुष्काळ, जलसंकटावर मात करता येणार नाही. त्यामुळे महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी नागरिकांना घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे आवश्यक आहे."- ॲड. किशोर शेळके, माजी महापौर

टॅग्स :amravati-acअमरावतीRainपाऊसWaterपाणी