शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

वऱ्हाडात जानेवारीपासूनच तीन हजारावर गावांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 10:29 IST

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साईड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे मंथन ५,५२९ उपाययोजनांचा उतारा; ७९ कोटी प्रस्तावित

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साईड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यालयाने ५,५२९ उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.यंदा पावसाळ्यात ७७७.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५८१ मिमी पडला. या चार महिन्यात केवळ ३६ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणीटंचाईची स्थिती जिल्हा प्रशासनाला विशद केली. मात्र, सर्वच जिल्हा परिषदांनी हा गंभीर विषय दुर्लक्षित केला. त्यामुळेच पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यांना विलंब झाला. विभागीय आयुक्तांनी याविषयी संबंधितांचे कान उपटल्यानंतर तब्बल महिनाभर उशिराने आराखडा तयार करण्यात आला. त्याचा एकत्रित कृती आराखडा गुरुवारी तयार करण्यात आला.विभागात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान १,९१५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी २६५३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ३४ कोटी ४५ लाख ७६ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १,३११ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यासाठी १,६४१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ११ कोटी ५४ लाख ४८ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये २६६ गावांतील ४३७ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येणार आहे. यावर २.४३ कोटी खर्च होतील. २,२८० गावांमध्ये २५१२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर १३.२३ कोटी, ५०३ गावांमध्ये ५२१ टँकरद्वारा पाणीपुरवठ्यावर १८.५८ कोटी, ५३१ गावांमध्ये नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर १९.५२ कोटी, ७९ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, १,००७ गावांमध्ये १,१७१ नवीन विंधन विहिरींवर १०.७० कोटी, तर २९७ गावांमध्ये २३७ तात्पुरत्या नळ योजना तयार करण्यासाठी १५.३१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.टंचाईग्रस्त गावे, उपाययोजना व निधीअमरावती जिल्ह्यात १४२८ गावांसाठी १७४५ उपाययोजनांवर १७.९९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात ५३४ गावांतील १०८४ उपायोजनांवर २६.८५ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ७९७ गावांतील १२१९ उपाययोजनांवर १८.९४ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६७० गावांतील ९०३ उपाययोजनांवर १०.७९ कोटी व वाशिम जिल्ह्यात ५१० गावांसाठी ५७८ उपाययोजनांवर ४.४९ कोटींचा निधी खर्च होणार आहे. विभागातील जलप्रकल्पांमध्येदेखील सरासरी ४२ टक्केच साठा आहे. अकोला जिल्ह्यात ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी