शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, अमरावती विभागावर जलसंकट, राज्यात ७१ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:48 IST

अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.

अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.२ डिसेंबरअखेर राज्यातील ३,२४२ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत ७१.१५ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत त्यात ४ टक्क्यांनी तूट नोंदविली गेली आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणक्षेत्रात पुरेसा जलसंचय होऊ शकला नाही. त्यामुळे अमरावती व नागपूर विभागातील पाणीसाठा संकुचित झाला आहेत.अमरावती विभागातील ४४३ मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांत केवळ ३८.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील ३८५ एकूण प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३६ टक्के जलसंचय आहे. कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ८५.१० टक्के, नाशिक प्रदेशातील ५५८ प्रकल्पांमध्ये ८१.७१ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ८६.३९ टक्के, तर मागील वर्षी भीषण दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाडा विभागात ६५.६१ टक्के असा समाधानकारक जलसाठा आहे.राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण ७६.२० टक्के पाणीसाठा आहे. त्यात कोकण, नाशिक, पुणे, मराठवाडामध्ये सरासरी ८५ टक्के पाणीसाठा असताना अमरावती विभागात ३९.४६ टक्के, तर नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३२.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात एकूण २५७ मध्यम प्रकल्प असून अमरावती विभागातील २४ प्रकल्पांत ४६.२४, कोकणात ८१.५३ टक्के, नागपूरमधील ४२ प्रकल्पांत ४८.०९ टक्के, नाशिकमध्ये ७५.७६, पुणे विभागात ७६.४३ व मराठवाड्यातील ८१ मध्यम प्रकल्पात ५८.७१ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील ४०९ लघु प्रकल्पांमध्ये ३१.०८ टक्के, कोकणातील १५७ प्रकल्पांत ७५.७६, नागपुरातील ३२६ लघु प्रकल्पांमध्ये ४१.६६ टक्के, नाशिकमधील ४८२ प्रकल्पात ६०.७७ टक्के, पुणे ५५.४३ व मराठवाड्यातील ८३२ प्रकल्पात ५१.२७ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीAmravatiअमरावती