शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी कचरा विलगीकरण अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:23 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची यशस्वी कार्यान्वयनासाठी कचरा विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘आऊटकम बेस’ यंत्रणेस बंधनकारक कंपोस्ट खत निर्मितीला द्यावे प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची यशस्वी कार्यान्वयनासाठी कचरा विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च २०१८ पर्यंत ज्या शहरांच्या अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, त्या शहरांना एप्रिल २०१८ पर्यंत दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.औरंगाबाद महापालिकेची ‘कचराकोंडी’ सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने कंपोस्ट डेपोचे प्रश्न निर्माणच होऊ नयेत, यासाठी घनकचरा विलगीकरणास प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत असलेल्या सविस्तर प्रकल्प अहवाल ची (डीपीआर) ची अंमलबजावणी करताना निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करणे (आऊटकम बेस) संबंधित पालिकांना बंधनकारक असेल.शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागी १०० टक्के विलगीकरण करणे, विलगीकरण केलेल्या १०० टक्के कचऱ्याची विलगीकृत पद्धतीने वाहतूक, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे अथवा त्यावर बायोमिथेनायझेशन पद्धतीची प्रक्रिया, खत निर्मिती करण्यात येत असेल तर ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या सेंद्रिय खताची मानकानुसार ‘हरित महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळविणे तसेच या सेंद्रिय खताची ब्रँडनेमने विक्री करणे ही उद्दिष्टे नगरपालिका, महापालिकांना पूर्ण करावी लागणार आहेत.सुक्या कचऱ्याचा पुनर्वापरसुक्या कचऱ्याचे पदार्थ पुनर्प्राप्ती सुविधा केंद्रावर दुय्यम विलगीकरण करावे, यापैकी पुनर्वापर होऊ शकणाऱ्या सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करावा अथवा शक्य असल्यास त्याची विक्री करण्याचे निर्देश महापालिका, नगरपालिकांना देण्यात आले आहेत.जुन्या कचऱ्यावर प्रक्रियाशहरातील डम्पिंंग साइटवर साठविलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, नव्हे तर ते बंधनकारकच असेल. ही प्रक्रिया केल्यानंतर ८० ते ९० टक्के जमीन पुनर्प्राप्त करणे आवश्यक करण्यात आले आहे. ज्या शहरांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे, त्या शहराचा प्रशासन प्रमुखांसाठी ते बंधनकारक असेल.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न