शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

ज्ञानक्रांतीचा राजमार्ग दाखविणारा योद्धा

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख म्हणजे उपेक्षित, वंचित आणि बहुजनांचे दीपस्तंभ. शिक्षणाचा मार्ग बहुजनांसाठी प्रशस्त करणारे ...

दिन विशेषअमरावती : डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख म्हणजे उपेक्षित, वंचित आणि बहुजनांचे दीपस्तंभ. शिक्षणाचा मार्ग बहुजनांसाठी प्रशस्त करणारे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भाऊसाहेबांचा आज ५० वा स्मृतिदिन. ‘लोकमत’च्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ आणि मूळ घराणे कदम. ज्या घराण्याचे इतिहासात चौफेर क्षात्रतेज उधळले. राजवैभव भोगले व मराठ्यांच्या लढवय्या वृत्ती ज्यांनी जोपासल्या, फुलवल्या, रूजविल्या व नावारूपाला आणल्या, तेच हे घराणे. या घरण्यात भाऊसाहेबांचा २७ डिसेंबर १८९८ साली जन्म झाला. हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते अमरावतीत आले. शिक्षणाची गोडी निर्माण झाली. अभ्यासू वृत्ती आणि चिंतनशीलतेच्या बळावर ते यशाचे टप्प्यांवर टप्पे गाठत गेले. अज्ञात प्रेरणेने, आंतरिक ओढीने अंतर्मुखजिद्द आणि चिकाटी त्यांच्यात मुळातच होती. कुठल्या तरी अज्ञात प्रेरणेने आणि आंतरिक ओढीने ते अंतर्मुख होत चालले होते. याच काळात त्यांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचा अंकुर फुटू लागला. अमरावतीच्या वास्तव्यादरम्यान योगायोगाने ७ फेब्रुवारी १९१७ साली श्रीमंत बाबासाहेब खापर्डे यांच्या कन्येच्या विवाहाच्या निमित्ताने भाऊसाहेबांची भेट लग्नाला आलेल्या महाराष्ट्र केसरी लोकमान्य टिळकांशी झाली. लोकमान्यांनी भाऊंच्या चेहऱ्यावरील कोणते भाव वाचले, कोणास ठाऊक. पण, मुद्दाम त्यांची चौकशी केली. त्यांच्यातील राष्ट्रभक्तीचा अंगार लोकमान्यांनी ओळखला होता. विलायतेतून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांची सामाजिक चळवळ अधिकच वाढत गेली. भाऊसाहेबांच्या वकिलीची सुरूवात झाली ती गुलाबराव नायगावकरांच्या अत्यंत गाजलेल्या खटल्याने. नायगावकरांचा सत्यशोधक जलसा हा त्याकाळी मोठा प्रख्यात होता. त्यातून ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सामाजिक भेदांवर अत्यंत तीव्र टीका केलेली असे. त्यामुळे विरोधकांनी नायगावकरांच्या तमाशात दंगल माजवली आणि पोलिसांनी गुलाबराव व त्यांच्यावर फौजदारी खटला भरला. भाऊसाहेबांनी त्यागाचे राजकारण केले. राजकीय विरोधकाला भाऊसाहेब वैयक्तिक जीवनात विरोधक मानत नसत. ते एक कुशल संघटक, कृषिमंत्री, समाजसेवक होते. ज्याने हे साधले ते होते डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख.