शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:24 IST

ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे ‘साथी हात बढाना’ । सामूहिक प्रयत्न, लोकसहभागातून जलजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. यामुळे किमान ३७ लाख ८० हजार लिटरने जलसाठा वाढणार आहे. शासनाचा कुठलाही निधी न वापरता जलजागृतीमधून आयुक्तांनी ही किमया साधली.वडाळीला गतवैभव प्राप्त व्हावे, याकामी आयुक्त निपाणे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दोन दिवस सामूहिक श्रमदान ही कल्पना साकारली. याला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. बघता बघता श्रमदानाची ही लोकचळवळ बनली व फक्त दहा दिवसांत १ हजार ७ ट्रक गाळ तलावातून काढण्यात आला. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, महापौर सुनील नरवणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक संघटना, डॉक्टर मंडळी आदी या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग नोंदविला. राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी, जवानदेखील यामध्ये सहभागी झाले. आयुक्तांच्या आवाहनावरून महापालिका कंत्राटदार असोसिएशन, क्रेडाई, एमआयडीसी असोसिएशन, महानेट, नीलेश चौरसिया, विजय खंडेलवार, रूपचंद खंडेलवाल आदींनी जेसीबी, ट्रक उपलब्ध करून दिले. शहरातील दोन हजारांवर नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झालेत.महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाच्या घरी शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग असले पाहिजे, यासाठी आयुक्त आग्रही आहेत. सर्वप्रथम त्यांनीच स्वत:च्या शासकीय निवासस्थानी ही यंत्रणा उभारली. सद्यास्थितीत महापालिकेच्या २३ अधिकारी व २२४ कर्मचाऱ्यांकडे जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याशिवाय महापालिकेची आठ कार्यालये, उद्याने, महापालिकेची मैदाने, रस्त्यांच्या कडेला, कंत्राटदारांमार्फत, महापालिका क्षेत्रात क्रेर्डामार्फत सदनिका, महापालिकेच्या शाळा, दवाखाने व सर्व आरओ प्लांट आदी ८०० हून अधिक ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.विशेष म्हणजे, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनीदेखील या कामासाठी पुढाकार घेतला.असा वाढणार जलस्तरदहा दिवसांत १३ जेसीबीच्या साहाय्याने १२,६०० चौरस मीटर जागेतून ३७८० घनमीटर म्हणजेच ४०,६७३ घनफूट गाळ काढण्यात आला व हा गाळ २५ ट्रकच्या साहाय्याने नेण्यात आला. १००७ ट्रक गाळ फक्त दहा दिवसांत काढण्यात आला. यामुळे ३७,८०,००० लिटर पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. तलावाच्या दोन किमी परिसरातील पाणीपातळी वाढणार आहे. महापालिकेचा निधी खर्च न करता लोकसहभागातून हे साध्य झाल्याचे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.सन १९४२ मध्ये वडाळी तलावाची निर्मितीब्रिटिश काळात सन १९४२ मध्ये या तलावाची निर्मिती अमरावती व बडनेराच्या जलापूर्तीसाठी करण्यात आली. वडाळीचे पाणीसंरक्षण क्षेत्र ११ चौरस किमी व पाणीसाठा आठ चौरस किमी आहे. त्यावेळी तलावाची खोली ही ३० फूट होती. १९७४ मध्ये तलावाचे सौदर्यीकरण करण्यात आले. यामध्ये गार्डन बोटिंग, परदेशी व देशी पक्ष्यांसाठी विसावा केंद्र, टॉय ट्रेन आदींची निर्मिती करण्यात आल्याने वडाळी तलाव शहराचे आकर्षणाचे केंद्र बनले. १९९४ पासून अमरावती शहरास मजीप्रामार्फत ऊर्ध्व वर्धा धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहराचा महत्त्वाचा जलस्रोत असलेला वडाळी तलाव दुर्लक्षित झाला होता.

टॅग्स :Waterपाणी