शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:24 IST

ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे ‘साथी हात बढाना’ । सामूहिक प्रयत्न, लोकसहभागातून जलजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. यामुळे किमान ३७ लाख ८० हजार लिटरने जलसाठा वाढणार आहे. शासनाचा कुठलाही निधी न वापरता जलजागृतीमधून आयुक्तांनी ही किमया साधली.वडाळीला गतवैभव प्राप्त व्हावे, याकामी आयुक्त निपाणे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दोन दिवस सामूहिक श्रमदान ही कल्पना साकारली. याला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. बघता बघता श्रमदानाची ही लोकचळवळ बनली व फक्त दहा दिवसांत १ हजार ७ ट्रक गाळ तलावातून काढण्यात आला. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, महापौर सुनील नरवणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक संघटना, डॉक्टर मंडळी आदी या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग नोंदविला. राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी, जवानदेखील यामध्ये सहभागी झाले. आयुक्तांच्या आवाहनावरून महापालिका कंत्राटदार असोसिएशन, क्रेडाई, एमआयडीसी असोसिएशन, महानेट, नीलेश चौरसिया, विजय खंडेलवार, रूपचंद खंडेलवाल आदींनी जेसीबी, ट्रक उपलब्ध करून दिले. शहरातील दोन हजारांवर नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झालेत.महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाच्या घरी शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग असले पाहिजे, यासाठी आयुक्त आग्रही आहेत. सर्वप्रथम त्यांनीच स्वत:च्या शासकीय निवासस्थानी ही यंत्रणा उभारली. सद्यास्थितीत महापालिकेच्या २३ अधिकारी व २२४ कर्मचाऱ्यांकडे जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याशिवाय महापालिकेची आठ कार्यालये, उद्याने, महापालिकेची मैदाने, रस्त्यांच्या कडेला, कंत्राटदारांमार्फत, महापालिका क्षेत्रात क्रेर्डामार्फत सदनिका, महापालिकेच्या शाळा, दवाखाने व सर्व आरओ प्लांट आदी ८०० हून अधिक ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.विशेष म्हणजे, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनीदेखील या कामासाठी पुढाकार घेतला.असा वाढणार जलस्तरदहा दिवसांत १३ जेसीबीच्या साहाय्याने १२,६०० चौरस मीटर जागेतून ३७८० घनमीटर म्हणजेच ४०,६७३ घनफूट गाळ काढण्यात आला व हा गाळ २५ ट्रकच्या साहाय्याने नेण्यात आला. १००७ ट्रक गाळ फक्त दहा दिवसांत काढण्यात आला. यामुळे ३७,८०,००० लिटर पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. तलावाच्या दोन किमी परिसरातील पाणीपातळी वाढणार आहे. महापालिकेचा निधी खर्च न करता लोकसहभागातून हे साध्य झाल्याचे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.सन १९४२ मध्ये वडाळी तलावाची निर्मितीब्रिटिश काळात सन १९४२ मध्ये या तलावाची निर्मिती अमरावती व बडनेराच्या जलापूर्तीसाठी करण्यात आली. वडाळीचे पाणीसंरक्षण क्षेत्र ११ चौरस किमी व पाणीसाठा आठ चौरस किमी आहे. त्यावेळी तलावाची खोली ही ३० फूट होती. १९७४ मध्ये तलावाचे सौदर्यीकरण करण्यात आले. यामध्ये गार्डन बोटिंग, परदेशी व देशी पक्ष्यांसाठी विसावा केंद्र, टॉय ट्रेन आदींची निर्मिती करण्यात आल्याने वडाळी तलाव शहराचे आकर्षणाचे केंद्र बनले. १९९४ पासून अमरावती शहरास मजीप्रामार्फत ऊर्ध्व वर्धा धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहराचा महत्त्वाचा जलस्रोत असलेला वडाळी तलाव दुर्लक्षित झाला होता.

टॅग्स :Waterपाणी