शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

भाडोत्री गुंडांना गावकऱ्यांनी पिटाळले

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना

सांडपाण्याचा वाद : आठ हल्लेखोरांसह तीन गावकरी जखमीचांदूरबाजार : सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच एकजूट करून गावकऱ्यांनी या गुंडांना पिटाळून लावले. यात आठ भाडोत्री गुंड जखमी झालेत. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कुरळपूर्णा येथे घडली. येथील वॉर्ड क्र.१ मध्ये शे. नईम त्यांची पत्नी शबाना अंजुुम व बहिणीसोबत राहतो. त्याच्या शेजारीच पत्नीची मोठी बहीण शकीला परवीनचे घर आहे. या दोन्ही कुटुंबात रस्त्यावरील नालीच्या सांडपाण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी १ वाजता शे. नईमचे तोंडगाव येथील सासुरवाडीतील मंडळी अचानक कुरळपूर्णा येथे धडकली. लगेच अमरावती येथील लालखडी भागातील सासुरवाडीतील अन्य नातलगदेखील लाल रंगाच्या सुमो एमएच २१-सी-२१४३ या गाडीने कुरळपूर्णा येथे पोहोचले. या सर्व नातलगांनी शेख नईम यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोन कुटुंबातील भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शे. जाकीर शे. बशीर (२३),अ. कलाम शे.हमीद (३४), शे.मुबीन शे. सत्तार(३२ सर्व रा. कुरळपूर्णा) यांच्यावर चाकुने हल्ला चढविला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. शेख नईम यांच्या घरावर बाहेरून आलेल्या २० ते २५ जणांनी हल्ला चढविल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी एकत्र आले. ग्रामस्थांनी एकजूूट करून हल्लेखोरांना पळवून लावले. शेवटी हल्लेखोर जंगलाने पळू लागले. गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. गावकऱ्यांच्या मारहाणीत दुल्लेखाँ मियाखाँ (६०), हाफीजखाँ दुलेखाँ(३०), रियाज खाँ दुलेखाँ, मोहसीन खाँ दुलेखाँ (३० रा. लालखडी, अमरावती) व अ. शकील अ. कदीर (३२ रा. तोंडगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यातील १५ आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेची माहिती चांदूरबाजार पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन १२ जणांविरुध्द भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)