शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video : वर्धा नदीतील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला, धबधब्याखाली घेतला होता आडोसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 08:33 IST

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत नदीपात्रात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह दिसत असून धबधब्यातूनही मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या धबधब्याच्या पायध्याला एक आडोसा घेऊन नाव थांबविण्यात आल्याची दिसून येत.

अमरावती - जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. नावाड्यासह तिघांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले. त्यात दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. इतरांचा शोध सुरु आहे. या घटनेपूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये, पाण्याच्या प्रवाहात नाव एका जागी थांबल्याचे दिसून येत आहे. 

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. त्यामुळे मटरे कुटुंबातील १२ जणांना नौकानयनाचा मोह झाला. सकाळी दहाच्या सुमारास नाव महादेव मंदिराकडे जात असताना उलटली. नावेत १३ जण होते. त्यात अतुल वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (२०), अदिती खंडाते (१०), मोना खंडाते (१२), आशु खंडाते (२१, सर्व रा. वर्धा), निशा मटरे (२२), पियुष मटरे (८, दोघे रा. गाडेगाव), पुनम शिवणकर (२६) यांचा समावेश आहे. नाविक नारायण मटरे (४५), किरण खंडारे (२८), वंशिका शिवणकर (२) यांचे मृतदेह सापडले. अद्यापही इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नदीपात्रात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह दिसत असून धबधब्यातूनही मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या धबधब्याच्या पायध्याला एक आडोसा घेऊन नाव थांबविण्यात आल्याची दिसून येत. याच प्रवाहात नावेतील प्रवाशांची संख्या अधिक असल्याने व पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने नावेचे संतुलन राखणे शक्य झाले नसल्याचे दिसून येते. 

बेकायदेशीर जलपर्यटनाचे बळी

नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथे मच्छीमारांच्या होड्यांमध्ये नदीत फेरफटका मारणे याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनेकदा नाविक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवतात. जलसफारी करताना जीवरक्षक साधनांचा वापर होत नाही. जल सफारी घडवणाऱ्या या होड्या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांना मच्छीमारी किंवा पर्यटन असा कोणताही परवाना नाही. हे ११ जण याच बेकायदेशीर जलपर्यटनाला बळी पडले.

अडथळ्यांतही बचावकार्य सुरू

मुसळधार पावसातही प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरू असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता आहे. अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या २० जणांची चमू दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची चमूही दाखल झाली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीDeathमृत्यूwardha-acवर्धाWardha Riverवर्धा नदी