शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

शेतातील मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:13 AM

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत ...

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत होता. आज आधुनिक युगात शेतकऱ्याने ही आपली वाटचाल बदलल्यामुळे आता मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमालाच्या रक्षणासाठी शेतात मचाण बांधत असे. साधारणत: शेताच्या मध्यभागी उंचावर ती बांधण्यात येत होती. पिकाचे जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे व स्वतःचेही रक्षण व्हावे, हा मचाण उंचावर बांधण्यामागचा हेतू असायचा. परंतु, कालांतराने अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीला जोडधंदा म्हणून अनेक योजना मिळत गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एखादी शेड बांधून कुक्कुटपालन, पशुपालन सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. ज्या शेतकऱ्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घराची निर्मिती केल्याचेही दिसून येते.

आता या मचाणकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसते आहे. पंधरा-वीस वर्ष अगोदर शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्वारी हे मुख्य पीक म्हणून पेरणी करत होता. परंतु, जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग लावणे बंद केले. त्यामुळे शेतामध्ये उंचावर मचाण बांधण्यातसुद्धा कालांतराने खंड पडत गेला, असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

पूर्वी शेताचे रक्षण करण्यासाठी मोठे जमीनदार आपल्या शेतामध्ये रखवालदार ठेवत असत. आता मात्र कोणीही शेतकरी रखवालदार ठेवत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याने रखवालदार ठेवणे गरजेचे होते, आता मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे, काटेरी अथवा विद्युत कुंपण योजनेंतर्गत झाल्याने रखवालदाराची गरजसुद्धा पडत नसल्याचे सांगितले जात आहे.

विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकरी तरी कसा मागे राहणार, त्यामुळे जुन्या रुढीला फाटा देत अशा मचाणांची संख्या लुप्त झाली आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला मचाणचे चित्र फक्त पुस्तकांमधूनच बघायला नक्की मिळणार...

170921\img-20210815-wa0502.jpg

फोटो