विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST2021-02-25T04:15:39+5:302021-02-25T04:15:39+5:30

अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, संचारबंदी लागू केलेली असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची आता खैर नाही. अशांची वाहने जप्त ...

Vehicles will be confiscated | विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त

विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त

अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, संचारबंदी लागू केलेली असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची आता खैर नाही. अशांची वाहने जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढविण्यात आलेली आहे. याशिवाय पेट्रोलपंपावरही आता ‘नो मास्क, नि पेट्रोल’ असे धोरण राबविण्यात येणार आहे. विविध संघटनाही प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी, फिक्स पॉईंट व पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. शहरात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यासह विविध पोलीस अधिकारी नाकाबंदी व फिक्स पॉईंटला भेटी देऊन ठिकठिकाणी तपासणी करीत आहेत. हॉटेलमधून पार्सलची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करताना काही नागरिक दिसून येत आहेत. स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे व समाजविघातक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई करण्याचा, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

बॉक्स

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पेट्रोलपंपचालक संघटनेशी बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेने मास्क नसलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पेट्रोल व डिझेल न देण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व पंपावर त्यासाठी फलकही लावण्यात येतील. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांनाच पेट्रोल देण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष नरेंद्र मेहता यांनी सांगितले. यावेळी सचिव सौरभ जगताप, सदस्य अखिलेश राठोड आदी उपस्थित होते.

Web Title: Vehicles will be confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.