शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

३० शाळा दुरुस्तीसाठी झेडपीत निधीची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विविध तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमधील वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांच्या भिंती पडल्या व छतावरील टीनपत्रे उडून गेले आहेत. आता या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नाही.

ठळक मुद्देविद्यार्थी बसणार कुठे? : वादळी वाऱ्याचा फटका, डीपीसीकडे डिमांड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १० मे रोजी झालेला वादळी पाऊस, गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांना फटका बसला आहे. पावसाचे दिवस तोंडावर आल्याने सदर शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा पैसा नाही. या शाळा दुरुस्त करण्यासाठी २९ मे रोजीच्या झेडपी आमसभेत निधी मागणीसाठी ठराव पारित केला आहे. सदरचा ठराव निधीकरिता जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, आता हा निधी केव्हा मिळणार आणि शाळा कधी दुरुस्त होतील, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विविध तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमधील वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांच्या भिंती पडल्या व छतावरील टीनपत्रे उडून गेले आहेत. आता या शाळा शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. परंतु, त्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नाही. या कामाकरिता जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी झेडपीने ठराव घेऊन तो जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी प्रस्तावित केला आहे. परंतु, या ठरावाच्या अनुषंगाने अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.या शाळांचे झाले नुकसानअमरावती तालुक्यातील नया अकोला, आमला, थुगाव, बोरगाव धर्माळे, खानापूर व नांदगाव पेठ. चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा. चांदूर बाजार तालुक्यातील कृष्णापूर, धानोरा पूर्णा. दर्यापूर तालुक्यातील घडा, सावंगा बु., बेंबळा बु. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, कोयलारी, चुर्णी. धारणी तालुक्यातील कुंड, कोट. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काजना, वाकपूर. तिवसा तालुक्यातील मार्डी व मसदी.१० मे रोजी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या भिंती कोसळल्या. टीनपत्रे उडून गेली. यात प्रचंड नुकसान झाले. या शाळा पावसाळा व नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करू न द्यावा.- प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Schoolशाळा