शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे महालेखाकारांकडून परीक्षण, गैरव्यवहाराची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 6:34 PM

राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच वनजमिनींबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. गत ३७ वर्षांपासून ‘महसूल’च्या ताब्यात असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन परत करण्यासाठी राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी २ डिसेंबर २०१६ रोजी आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशाला ‘महसूल’ने जुमानले नाही. वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी शासनस्तरावर बैठकांचे सत्र चालते. त्यानंतर ‘जैसे थे’ होते, हा शिरस्ता आहे. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आढावा घेताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनी परत घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्यात. मात्र, ‘महसूल’सोबत कोण वैर घेईल; त्यापेक्षा ‘टाइमपास’ करण्यातच यापूर्वीच्या तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भूमिका घेतली आहे. वनविभागाला घरचा आहेरमहसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनींचा ‘प्रसाद’ कुणाला मिळाला, यासंदर्भात १ जानेवारी २००० पासून उच्चस्तरीय चौकशी केल्यास डझनाहून जास्त तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक आरोपींच्या पिंजºयात उभे राहतील, असा दावा सेवानिवृत्त उपवनसंरक्षक हेमंत छाजेड यांनीच मुंबई येथील प्रधान महालेखाकारांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीचा हवाला देत ‘कॅग’ने १२ जानेवारी रोजी राज्य शासनाला पत्र पाठविताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

२० लाख हेक्टर वनजमिनीचे झाले नुकसान वनजमिनींचे वाटप करताना वरिष्ठ वनाधिका-यांनी नियमावली गुंडाळली. यामध्ये २० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यात रत्नागिरी/रायगड जिल्ह्यात ८०१९३, सिंधुदुर्ग - ३८५२१, मुंबई उपनगर - २४२६, नाशिक - २०९६१, ठाणे - ५०७३८, धुळे/नंदुरबार - ७५३९०, जळगाव - ७, अहमदनगर - ४३२८६, पुणे - ४६४२२, सातारा - ८३०७, कोल्हापूर - १७१९४, सोलापूर - १९१३९, सांगली - १३७६७, बुलडाणा - ४३३२३, अकोला - ६९७७, यवतमाळ/वाशिम - ७६७१६, अमरावती - ११७२०, नागपूर - ५१७७८, भंडारा/गोंदिया - ५६२९०, चंद्रपूर/गडचिरोली - ५६२९०, नांदेड - ११२०, बीड - १०९९९, लातूर - ३३७८, उस्मानाबाद जिल्ह्यात ७०८१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती