शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

ऊर्ध्व वर्धा तळाला; गाव, मंदिराचे अवशेष उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:05 IST

ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची भीषणता : धरणात केवळ १३ टक्के जलसाठा, शेतक री-कष्टकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष, मृत साठाच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.अमरावती जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या ऊर्ध्व वर्धा धरणाचे भूमिपूजन सन १९७६ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. विदर्भ सर्वात मोठे धरण म्हणून ऊर्ध्व वर्धाची ख्याती आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील या धरणाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील २ हजार ९५७ व मध्य प्रदेशातील १ हजार ३४५ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. अमरावती जिल्ह्यातील १३ गावांतील १ हजार २०१ आणि वर्धा जिल्ह्यातील ११ गावांतील १ हजार ४९५ अशी एकूण २ हजार ६९६ घरे पाण्याखाली बुडाली. या धरणामुळे अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ६६२ आणि वर्धा जिल्ह्यातील ६ हजार १५५ नागरिकांना आपले घरे गाव आणि शेतजमिनी सोडाव्या लागल्या. त्यांच्या समर्पणातून अप्पर वर्धा हे भव्य धरण साकारले. अमरावती व वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुके सुजलाम् सुफलाम् झाले. सन १९९४ मध्ये धरणाची दारे बंद करून पाणी साठविणे सुरू झाले. त्यावेळी विस्थापित गावांतील नागरिकांना बुडीत क्षेत्रातून बाहेर काढणे भाग पडले.करजगाव हे सन १९८० च्या सुमारास मूळ ठिकाणाहून विस्थापित करण्यात आले. या ठिकाणी नळ आणि वर्धा नदीचा संगम झाला. तिथून थोड्याच अंतरावर वर्धा नदी व माळू नदीचासुद्धा संगम झालेला आहे. या गावाचे पुनर्वसन तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरानजीक करजगाव येथे झाले. या ठिकाणी मंदिरात असलेल्या दोन्ही मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली.दोन वर्षांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची पातळी वाढली नाही. वाढत्या तापमानामुळे धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे निर्मितीपासून पाण्यात असलेली दोन्ही मंदिरे उघडी पडली आहेत. या ठिकाणी मारुतीरायाचे मंदिर तसेच शंकराचे मंदिरसुद्धा पाण्याबाहेर आले आहे.दुष्काळाने जागविल्या स्मृतीधरणासाठी संपादित केलेल्या करजगावातील हनुमान मंदिर तसेच शिव मंदिर यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याबाहेर आले आहे. या ठिकाणी सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, घराचे ओटे, परसातील विहिरी, विजेचे तुटलेले खांब, धान्याचे पेव असे अवशेष आढळून आले. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाचे अवशेषदेखील येथे आहे. दुष्काळाने स्मृती जागविल्याची प्रतिक्रिया पुनर्वसित करजगाव येथील रहिवासी दिगंबर महादेव वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प