शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर गावात अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

फोटो पी ०१ शिरपूर धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी ...

फोटो पी ०१ शिरपूर

धारणी : तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराच्या अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शिरपूर गावातील पंधरा ते वीस आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान उडाल्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करणे सुरू केले आहे

धारणी तालुक्यात मागील दोन दिवसापासून अचानक विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोराचा अवकाळी पडत होता. सोमवारला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान याच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या पावसात अचानक विजेच्या कडकडाट व वादळी वारा सुरू झाला. त्याचा फटका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावाला बसल्याने गावातील २० आदिवासी बांधवांच्या घरावरील टीनपत्रे अचानक उडाली. त्यामुळे आदिवासी बांधवांचे रात्रीच संसार उघड्यावर पडले. त्या भरपावसात आदिवासी बांधवांनी घरातील अन्नधान्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने घरातील पूर्ण अन्नधान्य ओले झाले. त्यासह घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतरही साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार अतुल पाटोळे, आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन आदिवासी बांधवांच्या नुकसानाची पाहणी केली व तात्काळ महसूल ग्रामपंचायत प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरपूर गावात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू झाले असून, नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांकडे सानुग्रह अनुदानाची मागणी

शिरपूर गावातील आदिवासी बांधवांना तहसील प्रशासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा निधी तहसील प्रशासनाकडे नसल्याने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सानुग्रह अनुदानाच्या रकमेची मागणी केली आहे. ते अनुदान आल्यांनातर तात्काळ प्रत्येकी सहा हजार रुपये आदिवासी बांधवांना देण्यात येणार आहे.