शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

अवकाळी, गारपिटीचा ४५ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 28, 2024 20:49 IST

प्राथमिक अहवाल : पश्चिम विदर्भात ८२३ गावांमधील रब्बी बाधित, सात गुरांचा मृत्यू.

गजानन मोहोड, अमरावती : २६ व २७ रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने पश्चिम विदर्भात १८ तालुक्यांतील ८२३ गावांत ४५ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत लहान-मोठ्या सात गुरांचा मृत्यू झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.विभागात पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात झालेले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेद्वारे होत आहे. अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात २५९ गावांत २१,७६८ हेक्टरमधील गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारी, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

याशिवाय अकोला जिल्ह्यात ३६१ गावांत १७,०६९ हेक्टरमधील रब्बी व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १४५ गावांत २,२७८ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३२ गावांत ४५० हेक्टर व वाशिम जिल्ह्यात २६ गावांमधील ३,०१४ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात एक बैल, अकोला जिल्ह्यात एक घोडा, बुलडाणा जिल्ह्यात दोन वासरे व वाशिम जिल्ह्यात एक बकरी, एक गोऱ्हे व एका गायीचा आपत्तीत मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी