शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अवकाळी, गारपिटीचा ४५ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 28, 2024 20:49 IST

प्राथमिक अहवाल : पश्चिम विदर्भात ८२३ गावांमधील रब्बी बाधित, सात गुरांचा मृत्यू.

गजानन मोहोड, अमरावती : २६ व २७ रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने पश्चिम विदर्भात १८ तालुक्यांतील ८२३ गावांत ४५ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत लहान-मोठ्या सात गुरांचा मृत्यू झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.विभागात पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात झालेले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेद्वारे होत आहे. अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यात २५९ गावांत २१,७६८ हेक्टरमधील गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारी, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

याशिवाय अकोला जिल्ह्यात ३६१ गावांत १७,०६९ हेक्टरमधील रब्बी व भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १४५ गावांत २,२७८ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३२ गावांत ४५० हेक्टर व वाशिम जिल्ह्यात २६ गावांमधील ३,०१४ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात एक बैल, अकोला जिल्ह्यात एक घोडा, बुलडाणा जिल्ह्यात दोन वासरे व वाशिम जिल्ह्यात एक बकरी, एक गोऱ्हे व एका गायीचा आपत्तीत मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी