शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठ म्हणते नापास! एम.एस्सी. विद्यार्थिनीपुढे वर्ष वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:07 IST

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे.

- गणेश वासनिक अमरावती -  बीएस्सी उत्तीर्ण झाल्याची विद्यापीठातून गुणपत्रिका मिळाली. त्याच्या आधारे एम.एस्सी. भाग-१ मध्ये प्रवेश घेतला. दिवसरात्र अभ्यास केला. आता परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे. या अजब कारभारामुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. दरम्यान, एम.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेशित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिचा प्रवेश रद्द करण्यास नकार देऊन तिला दिलासा दिला आहे.श्रुती पुंडलिक कडू असे सदर विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या उन्हाळी परीक्षेत बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षाच्या पेपरपैकी दोन 'बॅक' राहिले होते. श्रुतीने ते पुनर्मूल्यांकनाला टाकले असता, संगणकाच्या पेपरला २० ऐवजी २६ गुण मिळाले. त्यामुळे रसायनशास्त्राच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन रद्द करावे आणि मूळ गुण कायम ठेवून उत्तीर्ण गुणपत्रिका देण्यात यावी, असा अर्ज गोपनीय विभागात सादर केला होता. परंतु, या अर्जावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट विद्यापीठाने ३० आॅगस्ट २०१८ रोजी चार गुणांची वाढ देत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली. यानंतर एम.एस्सी. (संगणक विज्ञान) प्रथम वर्षाला तिने स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रथम सेमिस्टरसुद्धा दिले. दरम्यान, विद्यापीठाने आता तांत्रिक अडचण पुढे करून तिला बी.एस्सी. अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका घेऊन जावी, असे पत्राद्वारे कळविले आहे. रसायनशास्त्र पेपरच्या पुनर्मूल्यांकनात गुण कमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे श्रुतीपुढे पेच निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी ५० हजार रुपये खर्च झाले. एम.एस्सी.चे पहिले सत्र आटोपले. दुसºया सत्राची परीक्षा अवघ्या काही दिवसांत आहे. अशात तिचा प्रवेश रद्द झाल्यास, आर्थिक आणि शैक्षणिक वर्षाचे नुकसानास तिला सामोरे जावे लागणार आहे. 

पुनर्मूल्यांकनात दोन विषय होते. त्यापैकी एका विषयात ती उत्तीर्ण झाली होती. एक विषय तसाच राहिला होता. काही तांत्रिक चुकीमुळे श्रुती कडू हिला उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. आता हा विषय परीक्षा व मूल्यांकन मंडळापुढे निर्णयार्थ ठेवला जाईल. - राजेश जयपूरकर,     प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

बीएस्सी उत्तीर्ण गुणपत्रिकेच्या आधारेच श्रुती कडू हिला एम.एस्सी. प्रथम वर्षाला प्रवेश दिला. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने श्रृतीचा प्रवेश रद्द करण्याबाबत कळविले. मात्र, प्रवेश रद्द करता येणार नाही, असे विद्यापीठाला आम्ही कळविले आहे. श्रुतीचा एम.एस्सी. परीक्षा अर्ज विद्यापीठाने स्वीकारला नाही. - एन.सी. बेलसरे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र