शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

राष्ट्रीय लोकअदालत: भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा! मिटविले १६ कौटुंबिक वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:12 IST

‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.

अमरावती : येथील कौटुंबिक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात ५३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. पैकी एकूण १६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. ‘भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’ असा संदेश देत त्या १६ प्रकरणांपैकी पाच जोडप्यांचा संसार जुळविण्यात आला. ते एकत्र संसार करण्यासाठी घरी परतले. तर उर्वरित प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली.             

लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी ए. कस्तुरे यांनी पॅनल जज म्हणून कर्तव्य पार पाडले तसेच अधिवक्ता तृप्ती दुबे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. लोक अदालतीला जिल्हा न्यायाधिश आर. व्ही. ताम्हाणेकर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी भेट दिली.

न्यायाधीश आर. आर. पोंदकुले यांच्या मार्गदर्शनात विवाह समुपदेशक एस. एन. वेलरांधे, प्रभारी प्रबंधक उषा तिवारी, न्यायालयीन व्यवस्थापक धनंजय क्षिरसागर, लिपिक अलका चौबे, स्नेहा इंगोले, एस. आर. बाकडे यांनी परिश्रम घेतले.

नातवामुळे घडून आला समेट -कौटुंबिक न्यायालयातील लोक अदालतीत मिटविण्यात आलेल्या १६ प्रकरणापैकी पाच प्रकरणातील पक्षकारांनी आपसातील वाद मिटवून नव्याने संसार करण्याचा निर्णय घेतला. एका प्रकरणात आजी आजोबांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूपश्चात नातवाच्या भेटीकरीता प्रकरण दाखल केले होते. लोकअदालतीत सासु, सासरे व सुनेमधील तुटलेला संवाद पुनश्च सुरू होवुन नातवाच्या भेटीसंदर्भात आपसी समजोता झाला. ही बाब लोकअदालतमध्ये विषेश उल्लेखनीय ठरली. 

टॅग्स :Familyपरिवारhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय