रेशन दुकानातून तूर डाळ झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:17+5:302021-02-05T05:25:17+5:30

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या ...

Tur dal disappeared from the ration shop | रेशन दुकानातून तूर डाळ झाली गायब

रेशन दुकानातून तूर डाळ झाली गायब

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण

अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या तूर डाळ उपलब्ध नसल्याने शिधापत्रिकाधारकांना डाळीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. सावर्जनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित डाळीचा पुरवठा होत नसून ही डाळ कधी येते तर कधी येत नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना अत्यल्प दरात अन्यधान उपलब्ध करून दिले जात आहे. लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने केंद्र शासनाने एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्राधान्यक्रम अंत्योदय कार्डधारकांना मोफत तांदूळ व गहू वितरित केले. दरम्यान, नोव्हेबर महिन्यापाूसन रेशन दुकानांतून तूर डाळ मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार २ एवढे रेशन कार्डधारक लाभार्थी आहेत. तर ८००२८ एपील (केसरी) आणि २३,८८८ एपील (पांढरे) रेशन कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना उत्पन्न जास्त असल्याने स्वस्त धान्याचा लाभ दिला जात नाही. मात्र गहू, तांदूळ व साखर शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानात पात्र असलेल्या रेशन कार्डधारकांना दिले जात आहे. परंतु दोन महिन्यापासून तूर डाळ देणे बंद झाल्यामुळे रेशन कार्डधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बॉक्स

डाळ नसल्याच्या तक्रार कुठे?

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एखाद्या शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळत नसेल तर त्यांची तक्रार संबंधित तालुकास्तरावर अन्ननिरीक्षकांकडे केली जाऊ शकते. तेथे न्याय न मिळल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तक्रार करून हक्काचे रेशन मिळत नसल्याचे सांगण्यात येऊ शकते. केलेल्या तक्रारीबाबत संबंधित विभागाकडून चौकशी केल्यावर आरोप सिध्द झाल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही वेळप्रसंगी रद्द केला जाऊ शकतो. मात्र बहुतांश वेळी तक्रारच होत नसल्याने कारवाईसुध्दा होत नाही.

बॉक्स

रेशनवर गहू तांदूळ मिळतो

स्वस्त धान्य दुकानावर दर महिन्याला देण्यात येणाऱ्या नियमित धान्यासह अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिकाधारकाला साखरेचे वाटप केले जाते. नियमित धान्यामध्ये गहू, तांदूळ वाटप केले जात आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति सदस्य तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले गेलेत.

कोट

स्वस्त धान्य दुकानामार्फत पीएमजीकेऐवाय योजनेंतर्गत गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत तूर डाळ वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून डाळीचे नियतन अप्राप्त आहे. याबाबत वरिष्ठाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनेप्रमाणे पुढे कारवाई केली जाईल.

अनिल टाकसाळे

जिल्हा पुरवठा अधिकारी

बॉक्स

एकूण शिधापत्रिकाधारक ५,४७,००२

अंत्योदय योजना १,२३,६२७

प्राधान्य कुटुंब गट ३,०१,७३३

एपील शेतकरी १,२१,६४२

Web Title: Tur dal disappeared from the ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.