शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट

By admin | Updated: August 6, 2016 00:11 IST

यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे.

१५ गावांना फटका : शेतकऱ्यांची झाली निराशाटाकरखेडा संभू : यावर्षीच्या पहिल्याच हंगामात अतिवृष्टीमुळे तूर उत्पादकांना चांगला फटका बसला आहे. टाकरखेडा संभू परिसरात साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्ये काही शेतकऱ्यांना दोन महिन्यांत दोन ते तीन वेळा तुरीची पेरणी करावी लागली. परंतु तेही हाती लागले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी पेरणीयोग्य पाऊस येणार, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु ओल्या दुष्काळाने निराशा केली. पहिल्या पावसात जूनमध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्यापूर्ण केल्यात. परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बियाणे जळाले. त्यानंतर लगेच काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या केल्या आहेत. परंतु त्याही हाती लागल्या नाही. जेमतेम पीक निघाले होते. त्यावर पाण्याचे तळे साचल्याने तेही जळून गेले. पावसाचा अंदाज घेऊन एक संधी देण्याचे शेतकऱ्याने पुन्हा धाडस करून तुरीची पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे त्याचाही बीमोड झाला. या परिसरातील काही शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. मागील तीन वर्षांपासून नापिकाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा डोंगर असताना या नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, या आशेवर शेतकरी आहे. याच बरोबर उडीद, मूग, सोयाबीनच्या उत्पादकांनादेखील या अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला. याचे सर्वाधिक नुकसान भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू, साऊर, कळमगव्हाण, रामा, आष्टी, देवरी, जळका हिरापूर, मार्की मक्रमपूर, वायगाव, कामनापूर, जावरा, चांदूरबाजार तालुक्यातील लसनापूर, कृष्णापूर, तळवेल, जवळा शहापूर आदी गावांमध्य आहे. (वार्ताहर)