शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

झेडपीचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:11 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकारावर टाच : कृषी, बांधकाम, नोकर भरतीचे अधिकार शासनस्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.ग्रामविकास विभागाने मागील काही वर्षात पंचायतराज व्यवस्थेत शीर्ष संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली आहे. देशातील पंचायतराज संस्थांना अधिक अधिकार मिळावे, या उद्देशाने केंद्रशासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती केली. राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, ते अधिकार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी मिळावे, हा घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार राज्यातील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षित होते प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय तेही अंशत: झेडपीला दिले होते.त्यापैकी काही अधिकार हळूहळू सरकार परत घेत आहे. विशेष म्हणजे यंदा ७३ व्या घटनादुरुस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरुस्तीनुसार सर्व अधिकार मिळतिल, या आशेवर असलेल्या झेडपी पदाधिकाऱ्यांना अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे. पंचायत राज व्यवस्थेतून ग्राम विकास आणि तळागाळातील जनतेला राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी यासाठी या व्यवस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली त्यानंतर २०१४ मध्ये सत्तापालट झाली.सरकारने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या अस्तित्वाला पंख छाटणारे निर्णय घेतले जात असल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.रस्ते निर्मिती, शिक्षकांच्या बदल्याही शासनस्तरावरजिल्हा परिषदेच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला .पदभरती शासन करणार तर शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून होतात. वस्तू खरेदीसाठी ठराविक कंत्राटदारांची निवड करून त्यांच्याकडून खरेदीचे बंधनही घालण्यात आले.सेस फंडापुरते कृषी विभागाचे अस्तित्व!जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेली कृषी सेवा केंद्र परवाना ,बियाणे विक्री परवाना ,कीटकनाशक विक्री परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या तर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत बळकटीकरण हस्तांतरित झाली आहे.