शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

By गणेश वासनिक | Updated: April 8, 2023 17:21 IST

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक

अमरावती : विदर्भात वाघांची संख्या वाढली असताना त्यांचे स्थलांतर, अधिवासांची समस्या उद्भवली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांना अधिवासासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विदर्भातील पाच वाघांची बदली होणार असून, केंद्र सरकारने वाघांच्या अधिवास संदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर येत्या काळात सुरक्षितस्थळी वाघांचा मुक्काम असणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिनस्थ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांची संख्या वाढली ही बाब आनंददायी आहे. तथापि, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा अधिवास हा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे ज्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ‘ओव्हरफ्लो’ झाली, अशा ठिकाणाहून वाघ अन्य सुरक्षितस्थळी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार जागतिक व्याघ्र संघटनेने संमती दर्शविल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. विशेषत: ब्रह्मपुरी परिसरातील वाघ वणी, यवतमाळ, गडचिरोली, उमरेडपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. ब्रह्मपुरी बफर झोन भागात काही वाघ ‘मॅन ईटर’ झाल्यामुळे अशा वाघांची दुसरीकडे बदली केली जात आहे. ब्रह्मपुरीच्या वाघांसाठी नवेगाव- नागझिरा हे ठिकाण सुरक्षित असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून ३८५ वाघ असल्याची नोंद आहे. मात्र, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ असल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती या भागातील वाघांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्त्यांमध्ये वाघ धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

केंद्र सरकारची चमू पाहणी करणार

वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी वाघांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीअंती केंद्राची चमू व्याघ्र प्रकल्पात येईल. वाघांची ओळख, जन्म, वय, वातावरण, तृणभक्षी प्राणी, खाद्य, अधिवास, दोन जंगलातील अंतर, वृक्ष, वन्यजीव, प्रजाती आदींचा अभ्यास केल्यानंतर ही चमू एनटीसीएला वाघांच्या स्थलांतराबाबत अहवाल देईल.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी या बफर झोन भागातील पाच वाघ हे नवेगाव बांध-नागझिरा येथे पाठविले जाणार आहे. ब्रह्मपुरी भागात वाघांची संख्या वाढल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

- सुधीर मुनगंटीवार, वने सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागVidarbhaविदर्भSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारCentral Governmentकेंद्र सरकार