शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

By गणेश वासनिक | Updated: April 8, 2023 17:21 IST

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक

अमरावती : विदर्भात वाघांची संख्या वाढली असताना त्यांचे स्थलांतर, अधिवासांची समस्या उद्भवली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांना अधिवासासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विदर्भातील पाच वाघांची बदली होणार असून, केंद्र सरकारने वाघांच्या अधिवास संदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर येत्या काळात सुरक्षितस्थळी वाघांचा मुक्काम असणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिनस्थ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांची संख्या वाढली ही बाब आनंददायी आहे. तथापि, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा अधिवास हा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे ज्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ‘ओव्हरफ्लो’ झाली, अशा ठिकाणाहून वाघ अन्य सुरक्षितस्थळी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार जागतिक व्याघ्र संघटनेने संमती दर्शविल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. विशेषत: ब्रह्मपुरी परिसरातील वाघ वणी, यवतमाळ, गडचिरोली, उमरेडपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. ब्रह्मपुरी बफर झोन भागात काही वाघ ‘मॅन ईटर’ झाल्यामुळे अशा वाघांची दुसरीकडे बदली केली जात आहे. ब्रह्मपुरीच्या वाघांसाठी नवेगाव- नागझिरा हे ठिकाण सुरक्षित असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून ३८५ वाघ असल्याची नोंद आहे. मात्र, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ असल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती या भागातील वाघांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्त्यांमध्ये वाघ धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

केंद्र सरकारची चमू पाहणी करणार

वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी वाघांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीअंती केंद्राची चमू व्याघ्र प्रकल्पात येईल. वाघांची ओळख, जन्म, वय, वातावरण, तृणभक्षी प्राणी, खाद्य, अधिवास, दोन जंगलातील अंतर, वृक्ष, वन्यजीव, प्रजाती आदींचा अभ्यास केल्यानंतर ही चमू एनटीसीएला वाघांच्या स्थलांतराबाबत अहवाल देईल.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी या बफर झोन भागातील पाच वाघ हे नवेगाव बांध-नागझिरा येथे पाठविले जाणार आहे. ब्रह्मपुरी भागात वाघांची संख्या वाढल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

- सुधीर मुनगंटीवार, वने सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागVidarbhaविदर्भSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारCentral Governmentकेंद्र सरकार