शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

By गणेश वासनिक | Updated: April 8, 2023 17:21 IST

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक

अमरावती : विदर्भात वाघांची संख्या वाढली असताना त्यांचे स्थलांतर, अधिवासांची समस्या उद्भवली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांना अधिवासासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विदर्भातील पाच वाघांची बदली होणार असून, केंद्र सरकारने वाघांच्या अधिवास संदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर येत्या काळात सुरक्षितस्थळी वाघांचा मुक्काम असणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिनस्थ राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांची संख्या वाढली ही बाब आनंददायी आहे. तथापि, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा अधिवास हा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे ज्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ‘ओव्हरफ्लो’ झाली, अशा ठिकाणाहून वाघ अन्य सुरक्षितस्थळी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार जागतिक व्याघ्र संघटनेने संमती दर्शविल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. विशेषत: ब्रह्मपुरी परिसरातील वाघ वणी, यवतमाळ, गडचिरोली, उमरेडपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. ब्रह्मपुरी बफर झोन भागात काही वाघ ‘मॅन ईटर’ झाल्यामुळे अशा वाघांची दुसरीकडे बदली केली जात आहे. ब्रह्मपुरीच्या वाघांसाठी नवेगाव- नागझिरा हे ठिकाण सुरक्षित असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून ३८५ वाघ असल्याची नोंद आहे. मात्र, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २५० ते २७५ वाघ असल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती या भागातील वाघांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्त्यांमध्ये वाघ धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

केंद्र सरकारची चमू पाहणी करणार

वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी वाघांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारशीअंती केंद्राची चमू व्याघ्र प्रकल्पात येईल. वाघांची ओळख, जन्म, वय, वातावरण, तृणभक्षी प्राणी, खाद्य, अधिवास, दोन जंगलातील अंतर, वृक्ष, वन्यजीव, प्रजाती आदींचा अभ्यास केल्यानंतर ही चमू एनटीसीएला वाघांच्या स्थलांतराबाबत अहवाल देईल.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी या बफर झोन भागातील पाच वाघ हे नवेगाव बांध-नागझिरा येथे पाठविले जाणार आहे. ब्रह्मपुरी भागात वाघांची संख्या वाढल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल.

- सुधीर मुनगंटीवार, वने सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागVidarbhaविदर्भSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारCentral Governmentकेंद्र सरकार