पारंपरिक पद्धतीनेच होणार गण, गटांची प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 00:35 IST2015-08-25T00:35:54+5:302015-08-25T00:35:54+5:30

राज्यात ९ डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची पारंपारिक पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.

In the traditional way, the composition of the gana, the division of the groups | पारंपरिक पद्धतीनेच होणार गण, गटांची प्रभाग रचना

पारंपरिक पद्धतीनेच होणार गण, गटांची प्रभाग रचना

आयोगाचे आदेश : प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावासाठी ३१ आॅगस्ट ‘डेडलाईन’
गजानन मोहोड अमरावती
राज्यात ९ डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची पारंपारिक पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. प्रारुप प्रस्ताव सादर करण्याची अंतीम मुदत ३१ आॅगस्ट आहे. जिल्ह्यात १० पंचायत समितीचा यामध्ये समावेश आहे.
आयोगाच्या ७ जुलै व १० जुलैच्या आदेशानुसार मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी महाआॅनलाईनने विकसित केलेल्या आज्ञावलीद्वारे प्रारुप गण व गटांची रचना त्वरित सुरु करुन महाआॅनलाईनकडे हे प्रस्ताव ३१ आॅगस्टपर्यंत पाठवावे, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांनी ३१ आॅगस्ट रोजी पत्रान्वये दिल्या आहेत.
जनगणना कार्यालयाच्या माहितीनुसार, सेन्सस टाऊनमध्ये समाविष्ट असलेले ग्रामीण क्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील प्रगणक गटाचा तपशील व नकाशे उपलब्ध होत नसल्याने अशा परिस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील प्रगणक गटाच्या तपशीलाच्या अभावी जि. प, व पं. स.ची प्रभाग रचना संगणकीय प्रणालीने करता येणे शक्य नसल्याने सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटाच्या रचना पारंपारिक पद्धतीने करण्यात याव्यात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक गण तयार करताना पंचायत समिती क्षेत्राची एकूण लोकसंख्या भागीले त्या पंचायत समितीत देय असणारी एकूण सदस्य संख्या याप्रमाणे सरासरी लोकसंख्या काढण्यात येणार आहे. प्रत्येक गण या सरासरी लोकसंख्येपेक्षा १० टक्के अधिक किंवा १० टक्के कमी लोकसंख्येच्या मर्यादेत राहून तयार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १० पं.स. चा समावेश
जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या १० तालुक्यांमधील पंचायत समितीचा कार्यकाळ जून २०१७ मध्ये संपुष्टात येत असल्याने या तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटांची प्रारुप रचना करण्यात येणार आहे.

११८ गणांचा होणार प्रारुप आराखडा
जिल्ह्यात जून २०१७ मध्ये कालावधी संपणारी धारणी व सप्टेंबर २०१९ मध्ये कालावधी संपणाऱ्या तिवसा, चांदूररेल्वे व धारणी पंचायत समिती वगळता उर्वरित १० तालुक्यामधील ५९ जिल्हा परिषद गट व ११८ पंचायत समिती गणांचा प्रारुप प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येणार आहे.

नगरपंचायतीमुळे गण, गटांची रचना आणि नाव बदलणार
जिल्ह्यातील एप्रिल २०१५ मध्ये चार तालुक्याच्या मुख्यालयी नगरपंचायत स्थापित झाल्या आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये भातकुली व नांदगाव खंडेश्वर या पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने नव्याने रचनेत नगरपंचायतीचे नागरी क्षेत्र यामध्ये वगळण्यात येवून गण व गटाची रचना नव्याने होणार आहे. या तालुक्यामधील गण व गटाची रचना बदलून काही गणाचे नावात बदल होण्याची शक्यता आहे.

लोकमत
विशेष

Web Title: In the traditional way, the composition of the gana, the division of the groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.