शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या दिवशी लागला रमण परिणामाचा शोध

By admin | Updated: February 28, 2017 00:13 IST

चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. त्यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला.

राष्ट्रीय विज्ञान दिन : रमण आधुनिक विज्ञानाचे शिल्पकारअमरावती : चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. त्यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला. भौतीकशास्त्रात मद्रास येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्या काळात भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नव्हता त्यामुळे कोलकात्याला अर्थखात्यात त्यांनी नोकरी मिळविली. परंतु, रमन यांचा मूळचा पिंड विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्याचा होता. भौतिक संशोधनपर काही लेखही मान्यवर संशोधन पत्रिकांमधून प्रकाशित झाले होते. सरकारी नोकरीत असतानाही आपला सर्व फुरसतीचा वेळ विज्ञान संशोधन व अभ्यास यातच घालवित असत. अखेर सरकारी नोकरीत मन रमणे शक्य नसल्याने त्यांनी १९१७ मध्ये नोकरी सोडली आणि कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात (पलित प्राध्यापक) या पदावर दाखल होऊन तेथे अध्यापन व संशोधन कार्य सुरू केले. १६ वर्षे त्यांनी १९३३ पर्यंत पलित प्राध्यापक ही जागा भूषविली.निसर्गातील विविधरंगी सृष्टी, फुले, फुलपाखरे, मनोहारी रंगाचे पक्षी, खनिजे, रत्ने यांचे चित्ताकर्षक रंग या साऱ्याविषयी त्यांना विद्यार्थी दशेपासूनच कुतूहल वाटत आले होते. १९२१ मध्ये ब्रिटीश साम्राज्यांतर्गत विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून रमन उपस्थित राहिले. या निमित्ताने त्यांना युरोप व इंग्लंडच्या प्रवासाची संधी मिळाली. बोटीतून युरोपच्या वाटेवर असताना त्यांनी भूमध्य समुद्राचे स्वच्छ निळेशार पाणी पाहिले आणि सागर जलाच्या निळाईवर त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातूनच पुढे रमन परिणाम म्हणून जागतिक विज्ञान क्षेत्रात मान्यता पावलेल्या महत्वाच्या संशोधन कार्याचे बिज रुजून वाढीला लागले. अधिवेशनाहून परत आल्यावर रामन यांनी अनेक पारदर्शक वायू आणि घन पदार्थातून व द्रव पदार्थातून प्रकाशकिरण आर-पार जावू दिले असता त्या किरणांच्या स्वभावधर्मात काय फरक पडतो याचे संशोधन सुरू केले. या प्रयोगात त्यांना असे आढळले की अशा पारदर्शक पदार्थातून प्रकाशकिरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरस्त्र विखरून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा वर्णपट मूळच्या प्रकाश किरणांच्या वर्णपटापेक्षा वेगळा असतो.पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असताना प्रकाश कणांनी (फोटॉन्सची) टक्कर झाल्यामुळे हा विखुरणारा प्रकाश निर्माण होतो व माध्याचे रेणू व प्रकाशकण यांच्यातील प्रक्रियेने नव्या वर्णरेषा निर्माण होतात असे या घटनेचे स्पष्टीकरण रामन यांनी दिले. या शोधाने साऱ्या जगभऱ्याच्या विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली. रामन यांच्या या नव्या शोधाबद्दल त्यांना १९३० या वर्षाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.ब्रिटीश सरकारनेही त्यांना सर ही पदवी दिली. पादर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम हे नाव देण्यात आले. या नव्या वर्णरेषांना रामन लाईन्स अशी नावे देण्यात आली. तसेच या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. आज जगभर ही नावे रुढ झाली आहेत. १९५४ मध्ये भारत सरकारने रामन यांना भारतरत्न ही सर्वोच्च पदवी देवून सन्मान केला. त्याचवर्षी रशियानेही त्यांना लेनिन पारितोषिक देवून त्यांचा सन्मान केला. २१ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे बंगलोर येथे देहावसान झाले. अखेरपर्यंत त्यांचा अभ्यास आणि संशोधन कार्य सुरूच होते. शेवटच्या काळात त्यांनी पुन्हा ध्वनी संशोधन सुरू केले होते. मृत्यूपूर्वी एकच महिना आधी त्यांनी बंगलोर येथे इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ सायन्सच्या व्यासपीठावर व्याख्यान दिले होते, अशी माहीती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)