शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट

By गणेश वासनिक | Updated: February 4, 2025 11:58 IST

गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली.

अमरावती : देशात ९ राज्यांतील वाघांना तस्करांनी टार्गेट केल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव गुन्हे संस्थेने ३४ व्याघ्र प्रकल्पांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, ताडोबा आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे अस्तित्व जीवानिशी आले आहे. तर ९ राज्यांत किमान १८०० वाघांचे अधिवास आहेत. वाघांना धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे सहसंचालक डॉ. मनोज कुमार यांनी १ फेब्रुवारी रोजी व्याघ्र प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून अलर्ट केले आहे.

गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली. सध्या भारतात साधारणत: ४००० वाघांचे अस्तित्व आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा वाटा मोठा आहे. एकट्या भारतात वाघांचे ७३.७ टक्के अस्तित्व शाबूत आहे. मात्र भारतातील वाघांचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय तस्करांनी संपवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वाघांना शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी वनविभागाला परिश्रम घ्यावे लागेल, हे विशेष.

शेकडो वाघ टार्गेट

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांचे अवयव आणि कातडीला लाखोंची बोली लागते. त्यामुळे तस्करांनी देशातील ९ व्याघ्र प्रकल्पांना टार्गेट केले आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, पेंच, ताडोबा, गडचिरोलीचा समावेश आहे.

जिमकार्बेट गंगोत्री, राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड, अमनगढ, पिलीभित, वाल्मीकी नॅशनल पार्क उत्तर प्रदेश, बालाघाट, पेंच, मध्य प्रदेश, वेस्टर्न घाट म्हणजे गोवा, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ अशा ९ राज्यांतील व्याघ्र प्रकल्पात सुमारे १८०० वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात १००० वाघ सध्या आहेत. उर्वरित वाघ ७ राज्यात आहेत.

वनक्षेत्रात गस्त वाढवा 

वाइल्ड क्राईम ब्युरो संस्था ही सीबीआयच्या धर्तीवर वन्यजीव क्षेत्रात काम करते. या संस्थेने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांना अलर्ट जारी केला.

व्याघ्र प्रकल्प, राखीव वनातील वाघ आंतरराष्ट्रीय तस्करांच्या ‘हिटलिस्ट’वर आले असून तातडीने संवेदनशील वनक्षेत्रात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रेल्वे स्टेशन, मंदिरे, बसस्थानक, पडक्या इमारती, सार्वजनिक क्षेत्र, डेरा-तंबू आदी ठिकाणे तपासा अशी सूचना जारी केली आहे. इतकेच नव्हे तर गुप्तहेरांची मदत घेऊन तस्करांच्या मुसक्या आवळा आणि पोलिसांना सोबत घेण्याचा ‘डब्ल्यूसीसीबी’चा अलर्ट आहे.

वाघांची संख्या वाढतेय

देहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था ही दर चार वर्षांनी वाघांची संख्या जाहीर करते.

गेल्या १९ वर्षांत वाघांची संख्या ४००० हजारांच्यावर पोहोचलेली आहे. भारतात वाघांची संख्या वाढतच आहे. सन २०२६ ची आकडेवारी एका वर्षाने समोर येईल.

टॅग्स :TigerवाघAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारforestजंगल