शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांच्या टार्गेटवर ९ राज्यांतील वाघ, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचा अलर्ट

By गणेश वासनिक | Updated: February 4, 2025 11:58 IST

गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली.

अमरावती : देशात ९ राज्यांतील वाघांना तस्करांनी टार्गेट केल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव गुन्हे संस्थेने ३४ व्याघ्र प्रकल्पांना धोक्याचा इशारा जारी केला आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, ताडोबा आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे अस्तित्व जीवानिशी आले आहे. तर ९ राज्यांत किमान १८०० वाघांचे अधिवास आहेत. वाघांना धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे सहसंचालक डॉ. मनोज कुमार यांनी १ फेब्रुवारी रोजी व्याघ्र प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून अलर्ट केले आहे.

गतवर्षी १३ देशांच्या व्याघ्र शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार भारताने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केली. सध्या भारतात साधारणत: ४००० वाघांचे अस्तित्व आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा वाटा मोठा आहे. एकट्या भारतात वाघांचे ७३.७ टक्के अस्तित्व शाबूत आहे. मात्र भारतातील वाघांचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय तस्करांनी संपवून टाकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वाघांना शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी वनविभागाला परिश्रम घ्यावे लागेल, हे विशेष.

शेकडो वाघ टार्गेट

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांचे अवयव आणि कातडीला लाखोंची बोली लागते. त्यामुळे तस्करांनी देशातील ९ व्याघ्र प्रकल्पांना टार्गेट केले आहे. यात महाराष्ट्रातील सह्याद्री, पेंच, ताडोबा, गडचिरोलीचा समावेश आहे.

जिमकार्बेट गंगोत्री, राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड, अमनगढ, पिलीभित, वाल्मीकी नॅशनल पार्क उत्तर प्रदेश, बालाघाट, पेंच, मध्य प्रदेश, वेस्टर्न घाट म्हणजे गोवा, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ अशा ९ राज्यांतील व्याघ्र प्रकल्पात सुमारे १८०० वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात १००० वाघ सध्या आहेत. उर्वरित वाघ ७ राज्यात आहेत.

वनक्षेत्रात गस्त वाढवा 

वाइल्ड क्राईम ब्युरो संस्था ही सीबीआयच्या धर्तीवर वन्यजीव क्षेत्रात काम करते. या संस्थेने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांना अलर्ट जारी केला.

व्याघ्र प्रकल्प, राखीव वनातील वाघ आंतरराष्ट्रीय तस्करांच्या ‘हिटलिस्ट’वर आले असून तातडीने संवेदनशील वनक्षेत्रात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रेल्वे स्टेशन, मंदिरे, बसस्थानक, पडक्या इमारती, सार्वजनिक क्षेत्र, डेरा-तंबू आदी ठिकाणे तपासा अशी सूचना जारी केली आहे. इतकेच नव्हे तर गुप्तहेरांची मदत घेऊन तस्करांच्या मुसक्या आवळा आणि पोलिसांना सोबत घेण्याचा ‘डब्ल्यूसीसीबी’चा अलर्ट आहे.

वाघांची संख्या वाढतेय

देहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था ही दर चार वर्षांनी वाघांची संख्या जाहीर करते.

गेल्या १९ वर्षांत वाघांची संख्या ४००० हजारांच्यावर पोहोचलेली आहे. भारतात वाघांची संख्या वाढतच आहे. सन २०२६ ची आकडेवारी एका वर्षाने समोर येईल.

टॅग्स :TigerवाघAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारforestजंगल