शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीत सोडणार; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:00 IST

Amravati : विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व नगण्य झाले होते. मात्र, निसर्गसाखळी कायम राखण्यासाठी तिथे वाघ असणे गरजेचे आहे. विदर्भात विशेषतः पेंच आणि ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रादेशिक वर्चस्वासाठी वाघांमध्ये झुंज होतात. हे टाळण्यासाठी आठ वाघांना टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात सोडले जाईल. यापूर्वी पाठविलेले वाघ तिथे 'रमले' असल्याने वनविभागाचा आत्मविश्वास वाढला आहे. सह्याद्रीत २५ ते ३० वाघांचे संगोपन होऊ शकते, असे नियोजन आखले आहे.

सह्याद्रीत पर्यटनाला मोठा वाव

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली की, मुंबई, पुणे, ठाणे, कर्नाटक या भागांतून पर्यटकांना वाघ बघण्याची संधी सहज उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पाच वाघांचे स्थलांतर होणार असल्याची माहिती आहे. त्याकरिता सह्याद्रीतून उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षकांची चमू गत आठवड्यात विदर्भाचा दौरा करून गेली.

भटकंती करणाऱ्या वाघिणी टार्गेट

स्थलांतरित प्राणी नवीन जागी रुळतील का, हा मोठा प्रश्न असतो. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर नवीन ठिकाणी भक्ष्य आणि पाण्याचे स्रोत मुबलक असेल, तर हे प्राणी तिथे लवकर स्थिरावतात. सह्याद्रीत सध्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून वाघांना शिकारीसाठी भटकंती करावी लागणार नाही. विशेषतः विदर्भात व्याघ्र प्रकल्पाबाहेर भटकंती करणाऱ्या वाघिणीला सह्याद्रीत पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यातही ४ ते ६ वर्षे वयोगटाला प्राधान्य दिले जाणार आहे.

वनविभागाचे धोरण काय?

  • संख्या संतुलन : विदर्भातील अतिरिक्त वन्यजीवांचे इतरत्र स्थलांतर करून नैसर्गिक संतुलन राखणे.
  • संघर्ष निवारण : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 'हॉटस्पॉट'मधील प्राणी हलविण
  • शास्त्रीय देखरेख : स्थलांतरित केलेल्या प्रत्येक वाघावर 'रेडिओ कॉलर'द्वारे नजर ठेवली जाणार आहे.

"विदर्भातील व्याघ्र संवर्धन जागतिक स्तरावर कौतुकास्पद आहे. मात्र, वाढती संख्या व्यवस्थापित करण्यासाठी सह्याद्रीसारख्या सुरक्षित अधिवासात त्यांचे पुनर्वसन करणे हाच्च सर्वोत्तम पर्याय आहे. 'एनटीसीए'ने आठ वाघांच परवानगी दिली होती, त्यापैकी तीन वाघ सह्याद्रीत पाठविले आहेत."- एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Tigers to be Relocated to Sahyadri; NTCA Approval Granted

Web Summary : Due to overpopulation in Vidarbha's tiger reserves, five tigers will be relocated to the Sahyadri Tiger Reserve. This follows a successful initial relocation. The move aims to balance tiger populations and boost tourism in Sahyadri, with careful monitoring of relocated tigers.
टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ