शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोना संसर्गामुळे बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

अमरावती : दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना यंदा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे २६ मे रोजी अभयारण्ये, राखीव ...

अमरावती : दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना यंदा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे २६ मे रोजी अभयारण्ये, राखीव वनांत व्याघ्र गणनेला प्रवेश करता येणार नाही. सलग दुसऱ्या वर्षीही व्याघ्र गणना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने यंदा २६ मे रोजी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत असला तरी मनुष्यापासून वन्यजीवांना धोका होण्याची दाट शक्यता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका पत्राद्धारे व्यक्त केली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य नितीन काकोडकर यांनी बुद्धपैर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द झाल्याचे कळविले आहे. निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, बोर व सह्याद्री अभयारण्याच्या प्रमुखांना व्याघ्र गणना रद्द झाल्याबाबत वरिष्ठांनी कळविले आहे.

-----------------

कोरोना संसर्गामुळे यंदा २६ मे रोजी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द आहे. त्याअनुषंगाने वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात प्रवेश करता येणार नाही.

- जयोती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प