शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

दिशाहीन शासनाची तीन वर्षे

By admin | Updated: June 9, 2017 00:21 IST

पारदर्शी कारभार आणि विकासाचा अजेंडा पुढे करणारे केंद्र शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे.

बबलू देशमुख : विकास, पारदर्शी कारभाराचा दावा खोटा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पारदर्शी कारभार आणि विकासाचा अजेंडा पुढे करणारे केंद्र शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे. मोठ्या आणि निवडक उद्योजकांची घरे भरून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना कंगाल करणाऱ्या या शासनाने तीन वर्षांत देश भकास करून टाकला आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. मोदी शासनाने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने विकासाचा दावा भाजप पदाधिकारी करीत आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. भाजप शासनाने या तीन वर्षांत जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य आणि गरीब व शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळणारे आहेत. काँग्रेसच्या सत्ता काळात केवळ आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असा दावा करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. कर्जमुक्ती न देता कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर या शासनाने उभा केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी विदेशात दौरे करून काय साध्य केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. नोटाबंदी करून मोदी शासनाने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे. काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचाच भ्रष्टाचार आता समोर येतोय. महागाई कमी झालेली नाही. उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. सबसिडीच्या नावाखाली घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. कधी नव्हे इतके दहशतवादी हल्ले या तीन वर्षांत झाले आहेत. भाजप सरकार मात्र केवळ सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत केंद्र शासनाने केलेले सर्व दावे खोटे आहेत, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.