शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २९ ब्लॅक स्पॉट । वर्षभरात जिल्ह्यात १११६ अपघात

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १११६ रस्ते अपघातांमध्ये ३३४ बळी गेले आहेत. महिन्याकाठी सरासरी ९३ अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाल्याचे विदारक वास्तव पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत समोर आले. जिल्ह्यात अपघातप्रवण असे २९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे. वर्षभरात शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ३४९ अपघातांमध्ये ९२ जणांचा बळी गेला. यामध्ये ८५ पुरुष व सात महिला आहेत. शहरात एकूण २३ ब्लॅक स्पॉट आहेत.ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक ७६७ अपघातांमध्ये २४२ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये १८४ पुरुष व ५८ महिलांचा समावेश आहे. वर्षभरात ११०० पेक्षा जास्त अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. यामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, अजाणत्या वयात वाहन हाताळणे, मद्यपान करून वाहने चालविणे, निर्धारित मर्यादेपेक्षा जादा वेगाने वाहन चालविणे, इतर वाहनांना ओव्हरटेक, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण, सीट बेल्ट न लावणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे, भरस्त्यात वाहनांची पार्किंग करणे, अपघात टाळण्यारीता पुरेशा उपाययोजना नसणे, रात्री धोकादायक प्रवास आदींचा समावेश आहे.रस्त्यावरील खड्डे जीवघेणेजिल्ह्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांच्या हृदयाचे ठोके चुकवितात. हे खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीस्वारांचे बहुतांश अपघात होतात. योग्य दिशादर्शक फलक न लावणे, रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदराकडून खरबदारी न घेणे हीदेखील अपघाताची कारणे आहेत. अपघातात कुटुंबप्रमुख दगावल्यानंतर कुटुंबीयांची वाताहत होते. यामुळे प्रशासनाने जशा उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन कोरे यांनी केले.माझ्याकडे वाहतूक विभागाचा चार्ज असताना नोटिफिकेशन काढून शहरात आवश्यक त्या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. शहरात जड वाहनांना फक्त दुपारी २ ते ४ यावेळीतच परवानी दिली जाते. त्याची खबरदारी आम्ही घेतो. नागरिकांनीही वाहतूक नियंमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त, अमरावतीअपघाताच्या तीव्रतेवर ठरतात ‘ब्लॅक स्पॉट’जिल्ह्यात २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) आहेत. अमरावती शहर पोलीस हद्दीत २३, तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सहा ब्लॅक स्पॉट आहेत. तीन वर्षांत ५०० मीटरच्या हद्दीत जर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यासंदर्भातील उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.नागरिक जखमीरस्ते अपघातात पोलीस अमरावती शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात किरकोळ व गंभीर अपघातांमध्ये जखमींची संख्यादेखील मोठी आहे. एकूण ९३६ नागरिक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. शहरात ९६ गंभीर अपघातांत १५३ जण जखमी आणि १६५ किरकोळ अपघातांत २४१ जण जखमी झाले. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गंभीर व किरकोळ अपघातात ५४२ जण जखमी झाले.लिहून पाठवा तुमची मते !किड्या-मुंग्यांसारखी माणसे दगावतात, तेव्हा त्यामागे कुणाचा तरी दोष असतोच. बरेचदा ‘तांत्रिक’ बाबींवर हा दोष लोटून व्यवस्था हात झटकते. अपघातातानंतर अनेक कळवळणारे प्रश्न उरतातच. कधी विधवा पत्नीच्या रुपात, कधी इवल्या-इवल्या लेकरांच्या वेदनांमध्ये. तर कधी वृद्ध आईबाबांच्या उसाश्यांमध्ये. हे अपघात कसे थांबवता येतील? करुया ‘खुली चर्चा. पत्ता : लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, शिवाजीनगर, मोर्शी रोड, अमरावती.

टॅग्स :Accidentअपघात