शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू, दिवाळीच्या उत्साहावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:07 IST

शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य

अमरावती : शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य, तर ट्रान्सपोर्ट नगरात ट्रकखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला. संगीता लांजेवार (४०) व चंदू लांजेवार (४५, दोन्ही रा. सातरगाव) या दाम्पत्यासह कय्युम खां समद खां (६५,रा.आझाद कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. 

या अपघातात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मुलगा साहिल व चारचाकीतील राहुल जीवन गिरी (४०), साहिल राहुल गिरी (६), दक्ष राहुल गिरी (५) व श्रेयस रवींद्र गिरी (८,सर्व रा. गिरीराज कॉलनी, बडनेरा) गंभीर जखमी झाले. कय्युम खां समद खां (६५) सोमवारी सकाळी जमील कॉलनीतून पायी जात होते. दरम्यान गाडगेनगर हद्दीतील ट्रान्सपोर्टनगरात उभा असलेला एमएच २८बी-८०८९ क्रमांकाचा ट्रक मागे वळण घेत असताना कय्युम खां ट्रकच्या मागील चाकात चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी ट्रकचालक ज्ञानेश्वर आनंद धोटे (३०,रा महेंद्र कॉलनी) याला अटक करून ट्रक जप्त केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर पेट्रोलपंपानजीक चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यांचा मृत्यू झाला, चार लहान मुले गंभीर जखमी झाले. सातरगावातील रहिवासी चंदू लांजेवार, त्यांची पत्नी संगीता लांजेरावर व मुलगा साहिल लांजेवार हे तिघेही सोमवारी सायंकाळी दुचाकीने बडनेराकडून सातरगावाकडे जात होते. दरम्यान मागून येणाºया भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहिल व कारमधील गिरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विशाल भोसले व अशफाक यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालया आणले.  

अनधिकृत पार्किंगचा बळी-ट्रान्सपोर्टनगरात ट्रकचालक रस्त्यावरच अनधिकृत ट्रक पार्किंग होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पार्किंगमुळे कय्युम खां यांचा बळी गेला. यासंदर्भात मध्यंतरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावेळी पोलिसांनी थातुरमातूर कारवाई  केल्याने पुन्हा ट्रान्सपोर्टनगरात रस्त्यावर ट्रकचालकांची मनमानी वाढली आहे. कोंडेश्वरजवळील एक्सप्रेस हाय-वेवर भरधाव वाहनांची वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात