शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू, दिवाळीच्या उत्साहावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:07 IST

शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य

अमरावती : शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य, तर ट्रान्सपोर्ट नगरात ट्रकखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला. संगीता लांजेवार (४०) व चंदू लांजेवार (४५, दोन्ही रा. सातरगाव) या दाम्पत्यासह कय्युम खां समद खां (६५,रा.आझाद कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. 

या अपघातात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मुलगा साहिल व चारचाकीतील राहुल जीवन गिरी (४०), साहिल राहुल गिरी (६), दक्ष राहुल गिरी (५) व श्रेयस रवींद्र गिरी (८,सर्व रा. गिरीराज कॉलनी, बडनेरा) गंभीर जखमी झाले. कय्युम खां समद खां (६५) सोमवारी सकाळी जमील कॉलनीतून पायी जात होते. दरम्यान गाडगेनगर हद्दीतील ट्रान्सपोर्टनगरात उभा असलेला एमएच २८बी-८०८९ क्रमांकाचा ट्रक मागे वळण घेत असताना कय्युम खां ट्रकच्या मागील चाकात चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी ट्रकचालक ज्ञानेश्वर आनंद धोटे (३०,रा महेंद्र कॉलनी) याला अटक करून ट्रक जप्त केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर पेट्रोलपंपानजीक चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यांचा मृत्यू झाला, चार लहान मुले गंभीर जखमी झाले. सातरगावातील रहिवासी चंदू लांजेवार, त्यांची पत्नी संगीता लांजेरावर व मुलगा साहिल लांजेवार हे तिघेही सोमवारी सायंकाळी दुचाकीने बडनेराकडून सातरगावाकडे जात होते. दरम्यान मागून येणाºया भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहिल व कारमधील गिरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विशाल भोसले व अशफाक यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालया आणले.  

अनधिकृत पार्किंगचा बळी-ट्रान्सपोर्टनगरात ट्रकचालक रस्त्यावरच अनधिकृत ट्रक पार्किंग होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पार्किंगमुळे कय्युम खां यांचा बळी गेला. यासंदर्भात मध्यंतरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावेळी पोलिसांनी थातुरमातूर कारवाई  केल्याने पुन्हा ट्रान्सपोर्टनगरात रस्त्यावर ट्रकचालकांची मनमानी वाढली आहे. कोंडेश्वरजवळील एक्सप्रेस हाय-वेवर भरधाव वाहनांची वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात