शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:13 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्पांचे दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा धरण गेल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते. पूर्वी धरणाचे तीन दरवाजे उघड्यात आले होते. आता मंगळवारपासून १० सेंमीने पाच दरवाजे उघडण्यात आले असून, वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा बेंबळा हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाचे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९८.२३ टक्के पाणीसाठा साचल्यामुळे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार चार प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्क करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४५.०३ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात सर्वात कमी १३.३४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त २४.३० टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पेनटाकळी प्रकल्पात चांगला पाणीसाठा साचला असला तरी नळगंगा प्रकल्पात ३८.४९ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प शुन्य टक्यांवरून आता ५.१६ टक्क्यांवर गेला आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७१.८२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७०.१९ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ प्रकल्पांत सरासरी ४९.९५ टक्के पाणीसठा साचला असून मध्यम, मोठे व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.९१ टक्के पाणीसाठा साचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्केयंदा पाच मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, नवरगांव, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा, मस, पलढग प्रकल्पांचा समावेश आहे, तर अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.७४ टक्के पाणीसाठा आहे. पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा ९१.८९ टक्के १५ सेमींने दोन दरवाजे उघडले आहेत. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळमधील बोरंगाव ९७.४३ टक्के, बुलडाणामधील तोरणा ९८.१० टक्के सदर प्रकल्प शंभर टक्याच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Waterपाणी