शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:13 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्पांचे दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा धरण गेल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते. पूर्वी धरणाचे तीन दरवाजे उघड्यात आले होते. आता मंगळवारपासून १० सेंमीने पाच दरवाजे उघडण्यात आले असून, वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा बेंबळा हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाचे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९८.२३ टक्के पाणीसाठा साचल्यामुळे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार चार प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्क करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४५.०३ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात सर्वात कमी १३.३४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त २४.३० टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पेनटाकळी प्रकल्पात चांगला पाणीसाठा साचला असला तरी नळगंगा प्रकल्पात ३८.४९ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प शुन्य टक्यांवरून आता ५.१६ टक्क्यांवर गेला आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७१.८२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७०.१९ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ प्रकल्पांत सरासरी ४९.९५ टक्के पाणीसठा साचला असून मध्यम, मोठे व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.९१ टक्के पाणीसाठा साचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्केयंदा पाच मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, नवरगांव, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा, मस, पलढग प्रकल्पांचा समावेश आहे, तर अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.७४ टक्के पाणीसाठा आहे. पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा ९१.८९ टक्के १५ सेमींने दोन दरवाजे उघडले आहेत. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळमधील बोरंगाव ९७.४३ टक्के, बुलडाणामधील तोरणा ९८.१० टक्के सदर प्रकल्प शंभर टक्याच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Waterपाणी