शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चोर उठले जिवावर, 'सीपी' तरीही मेहेरबान अधिकाऱ्यांवर!

By admin | Updated: June 21, 2014 01:16 IST

घरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत.

गणेश देशमुख अमरावतीघरफोड्या करणारे चोर आता दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले करून खुलेआम चोरी करू लागलेत. सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला तरीही का मेहरबान आहेत, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शहरातील फरशी स्टॉप भागात गुरुवारी दिवसाढवळ्या एका वृद्धेचा गळा आवळून चोरांनी घरातून दागिने लूटून नेलेत. आतापर्यंत घरे फोडून चोरी करणारे चोरटे नागरिकांच्या प्राणांवर उठले आहेत. पोलीस आयुक्तांनी वेशांतर करून फिरण्याची अपेक्षा जनतेची असताना आता चोरच वेशांतर करून अधिक गंभीर गुन्हे करीत फिरू लागले आहेत. गुरुवारच्या घटनेत चोर बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून राजरोसपणे घरात शिरले. घरातील माणसांचा राबता लक्षात घेतला. संधी साधून चहापाणी करणाऱ्या सवितार्इंवरच हल्ला केला. लूटमार करून ते पसार झाले. पोलीस तमाम अधिकाऱ्यांच्या तुलनेत सतत तल्लखपणा दाखविणाऱ्या या चोरांनी यावेळीही चोरीच्या बदलविलेल्या पद्धतीतून स्वत: पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे शिक्कामोर्तब केले. हे तर हत्यारेच !सविता पांढरीकर चोरांच्या हल्यात बेशुद्ध झाल्या असल्या तरी, खरे तर चोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाच केला होता. त्या मृत झाल्याचे समजूनच चोरांनी त्यांच्या अंगावरील सुमारे ६० ग्रॅम सोने लूटून नेले. 'काळ आला होता; पण वेळ आली नसल्या'ने वृद्ध सवितातार्इंचा जीव वाचला. घरात शिरून दिवसाढवळ्या नागरिकांना ठार मारण्याचा जो इरादा चोरांचा होता, तो बघता अमरावतीकर पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. आदीदास शोरूममधील चोरीप्रकरणी आणि गुरुवारी रात्री विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी अमरावती पोलिसांनी उत्तम आणि वेगवान तपासकार्य केले. त्यासाठी पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी. त्याचवेळी पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारांना भय वाटेनासे झाले, हे जळजळीत वास्तव पुन्हा एकदा ठळपणे समोर आल्याची आठवणही त्यांना करून द्यावीशी वाटते. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत गंभीर गुन्हे घडत आहेत, पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी, ही लोकभावना आहे. नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा नाही, हा संदेश देऊन आयुक्तांनी लोकभावनेचा आदर का करू नये?