सोयाबीन बियाण्यांची अधिक टंचाई भासणार
By Admin | Updated: May 24, 2014 23:13 IST2014-05-24T23:13:38+5:302014-05-24T23:13:38+5:30
जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी विभागाने बियाणे बदलाचे प्रमाण घटवून घरगुती बियाण्यांच्या

सोयाबीन बियाण्यांची अधिक टंचाई भासणार
अमरावती : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी विभागाने बियाणे बदलाचे प्रमाण घटवून घरगुती बियाण्यांच्या वापरावर भर दिला आहे. तर कपाशी आणि तुरीचे मुबलक बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सोयाबीन लागवडीखाली २ लाख ७३ हजार क्षेत्र अपेक्षित आहे. हेक्टरी ७५ किलो बियाणे लागण्याचा अंदाज असून त्या हिशोबाने जिल्ह्याला २ लाख ७९ हजार क्विंटल बियाणे लागतील. पैकी ३0 क्विंटल महाबीज ५ हजार क्विंटल राष्ट्रीय बियाणे महामंडळ तर खासगीच्या २0 ते २२ कंपन्या ४0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देतील, असे कृषी विभागाला अपेक्षित आहे. शेतकर्याकडे ३७ हजार क्विंटल बियाणे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातून केवळ ८७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता राहणार असल्याने तब्बल १ लाख ९२ हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महाबियाने सुरुवातीला ६0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र सोयाबीनचे लॉट मोठय़ा प्रमाणात अनुत्तीर्ण झाल्याने त्याची उपलब्धता घटवून ३0 हजार क्विंटलवर आणली गेली. महाबीजकडे या हंगामात एकूण २८ हजार क्विंटल सोयाबीन प्रक्रियेसाठी आले. पैकी २३ हजार क्विंटलची उगवण क्षमता ७0 टक्क्यांपेक्षा कमी निघाल्याने ते कसोटीवर अनुत्तीर्ण ठरले. केवळ ७00 क्विंटल बियाणे प्रमाणित झाले. २१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचा महाबीजचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थिती सर्वाधिक भयावह आहे. या विभागाकडे केवळ ५८ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सद्यस्थितीत सोयाबीनचे एकूण ६५८0 क्विंटल तर कपाशीचे १ लाख १५ हजार ८९६ पाकिटे (प्रति पाकीट ४५0 ग्रॅम) बियाणे बाजारात उपलब्ध झाले. (प्रतिनिधी)